पेट्रोल संपल्याचे,बिघाड झाल्याचे सांगितले जातेय कारण
प्रतिनिधी/कोल्हापूर
लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही कारणासाठी पेट्रोल आणि डिझेलचे वितरण करू नये अशा स्पष्ट सूचना जिल्हा प्रशासनाने जिह्यातील पेट्रोल पंपचालकांना दिल्या आहेत. पण जिह्यातील बहुतांशी पंपचालकांकडून अत्यावश्यक सेवेतील दुचाकी आणि चारचाकी वाहनांना पेट्रोल, डिझेल देताना अडवणूक केली जात आहे. ओळखपत्र दाखवल्यानंतरही इंधन दिले जात नाही. आणि दिलेच तर ते अपुऱया प्रमाणात दिले जाते. पन्हाळा तालुक्यातील मरळी येथील इंडियन ऑईलच्या अक्षय पेट्रोल पंपामध्ये बिघाड झाल्याचे कारण पुढे केले जात आहे. तर कळे येथील यशवंत सहकारी संघाच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल शिल्लक असूनही संपल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि यंत्रणेची मोठी कुचंबना होत आहे.
डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, औषध दुकानदार, इतर अत्यावश्यक सेवा पुरविणारी यंत्रणा, पत्रकार आदी घटकांचा अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश केला आहे. त्यांच्या कामकाजामध्ये कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी त्यांना आवश्यक तितके पेट्रोल,डिझेल देण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने पेट्रोलपंप धारकांना दिले आहेत. त्यानुसार जिह्यातील बहुतांशी पेट्रोलपंपांवर सूचनांचे पालन केले जात आहे. पण कोल्हापूर गगनबावडा महामार्गावरील कळे, मरळी परिसरातील पेट्रोल पंप चालकांचा मनमानी कारभार सुरु आहे. यामधील काही पंपावरील कर्मचारी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांना डावलून ठराविक वेळेत आपल्या संबंधित लोकांना पेट्रोल देतात. मरळी येथील अक्षय पेट्रोल पंप नादुरुस्त असल्याचे सांगून पेट्रोल दिले जात नाही. गेल्या चार ते पाच दिवसांपासून हा पंप बंदच आहे. कळेतील यशवंत संघामध्ये तर पेट्रोल शिल्लक असतानाही पेट्रोल संपले आहे असा बोर्ड लावला आहे. तेथे पुरेसा इंधन साठा असतानाही अत्यावश्यक सेवांसाठी दिला जात नसल्याचे चित्र आहे. परिणामी संबंधित कर्मचाऱयांना नियोजित वेळेत पोहोचणे अशक्य बनत आहे. करवीर तालुक्यातील दोनवडे, बालिंगा, फुलेवाडी येथील पेट्रोलपंपांवरही अशीच स्थिती पहावयास मिळते. त्यामुळे पुरवठा विभागाने अत्यावश्यक सेवेतील ग्राहकांची कुचंबना करणाऱया या पेट्रोल पंपांवर कारवाई करण्याची गरज आहे.