ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
बालाकोट एअर स्ट्राईकनंतर 27 फेब्रुवारी 2019 रोजी आपल्या मिग-21 विमानाने पाकिस्तानच्या अत्याधुनिक एफ-16 लढाऊ विमानाला पाडणाऱ्या अभिनंदन वर्धमान यांना आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘वीर चक्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अभिनंदन यांना याआधी ‘शौर्य चक्र’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
तसेच जम्मू-काश्मीरमध्ये नायब सुभेदार सोमबीर यांनी एका कारवाईदरम्यान एका मोठय़ा दहशतवाद्याची हत्या केल्याबद्दल त्यांना मरणोत्तर शौर्य चक्र पुरस्कार देण्यात येणार आहे. पाच दहशतवाद्यांना ठार मारणाऱ्या मेजर विभूती शंकर धोंडियाल यांनाही मरणोत्तर शौर्यचक्र पुरस्कार देण्यात येणार आहे. तर कॉर्प्स ऑफ इंजिनिअर्स साईपर प्रकाश जाधव यांना मरणोत्तर कीर्ती चक्र पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.