उमेदवारी मागे घेण्याचा दिवस
प्रतिनिधी /पणजी
राज्य विधानसभेच्या दि. 14 फेब्रुवारी रोजी होणाऱया निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमधून छाननीनंतर 332 उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरण्यात आले आहेत. आज अर्ज मागे घेण्याचा दिवस असून त्यानंतरच रिंगणात राहिलेल्या उमेदवारांची नक्की संख्या स्पष्ट होणार आहे.
विधानसभेच्या 40 मतदारसंघांमधून एकुण 587 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. परंतु त्यातील बहुतेकांनी एकापेक्षा जास्त अर्ज दाखल केले होते. ही संख्या प्रत्येकी दोन ते चार अर्जांपर्यंत सुद्धा होती. शनिवारी झालेल्या छाननीत एकुण 139 अर्ज बाद ठरविण्यात आले तर एकाने पूर्वीच माघार घेतली आहे. त्यामुळे 332 अर्ज ग्राह्य धरण्यात आले आहेत.
आज सोमवार दि. 31 जानेवारी रोजी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. माघार घेणारे बहुतेक अर्जदार हे एकतर स्वतःचेच डमी किंवा कोणत्यातरी उमेदवारासाठी डमी म्हणून अर्ज सादर करणारेच असणार आहेत. त्यात पत्नी किंवा अन्य नातेवाईकाचा समावेश असेल. त्यानंतर सायंकाळी चित्र स्पष्ट होणार आहे.