बेंगळूर/प्रतिनिधी
१ जानेवारी २०२१ पासून शाळा व महाविद्यालय सुरू करण्याच्या तयारी दरम्यान प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी बुधवारी शहरातील अनेक शाळा, महाविद्यालये भेट देऊन व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांशीही ते बोलले आणि शाळा व महाविद्यालय सुरू करण्याविषयी त्यांची मते जाणून घेतली. मंत्रु सुरेश यांनी पालकांना त्यांनी भीती व काळजी न करता मुलांना शाळेत पाठवावे असे आवाहनही त्यांनी केले. १ जानेवारीपासून दहावी व बारावीचे वर्ग सुरू होतील. १५ जानेवारीपासून नववी आणि अकरावी वर्ग सुरू करण्याचे नियोजन आहे.
शाळेत जाणे सक्तीचे नाही
मंत्री सुरेशकुमार यांनी शाळा सुरु झाल्यांनतर विद्यार्थ्यांना शाळेत जाणे अनिवार्य नाही, असे ते म्हणाले. शाळा अधिकारी सर्व खबरदारीचे उपाय घेत आहेत. आरोग्य विभागदेखील शाळा प्रशासनाकडे लक्षपूर्वक काम करीत आहे. असे असूनही, ज्या पालकांनी मुलांना शाळेत पाठवायचे नाही अशा पालकांवर दबाव आणला जाणार नाही. शाळेत जाणे सक्तीचे नसून ऐच्छिक आहे.
संमती पत्र आवश्यक आहे
मंत्री सुरेश कुमार यांनी ऑनलाइन शिक्षण हे ऑफलाइनइतके प्रभावी नाही. मुले शाळेत शिकतात. पालकांना मुलांसमवेत एक संमती फॉर्म पाठवावा लागेल. मास्क घालून वर्ग होतील. यावेळी सामाजिक अंतर आणि हात स्वच्छता इत्यादींचीही काळजी घेतली जाईल.
मुलांच्या हिताचा निर्णय
सरकारने विद्यार्थ्यांच्या हितासाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बेंगळूरमध्ये राहणारी मुले ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. परंतु दुर्गम खेड्यात राहणारी सर्वसामान्य मुले ऑनलाइन आणि ऑफलाईन अशा दोन्ही शिक्षणापासून वंचित आहेत. बर्याच भागात बालकांना बालमजुरीसाठी पाठविले जात आहे. बालविवाह वाढले आहेत. अशा अनेक तक्रारी विभागाकडे आल्या आहेत. मुलांना शिक्षणापासून दूर ठेवले जात आहे. विद्यार्थ्यांना सतत शिक्षणाशी जोडले जावे या उद्देशाने शाळा सुरू केल्या आहेत. जर मुलांना सर्दी, ताप आणि खोकला असेल तर त्यांना स्वतंत्र खोल्यांमध्ये ठेवून योग्य उपचार दिले जाईल.
दरम्यान कोविड तांत्रिक सल्लागार समितीच्या सल्ल्यानुसार शिक्षण विभागाने जानेवारी २०२१ पासून दहावी आणि बारावीच्या मुलांसाठी शाळा-महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.