‘उत्तम शेती, मध्यम धंदा व कनिष्ठ नोकरी’ ही व्यावहारिक म्हण भारतीय अर्थ-शेती-व्यवसायाच्या संदर्भात सुमारे 50 वर्षांपर्यंत लागू होती. नंतरच्या काळात आपल्या एकूणच अर्थव्यवस्थेत, व्यावहारिक मानसिकतेत बरेच बदल झाले. व्यवसाय म्हणून शेतीकडे पाहण्याच्या संकल्पना बदलत गेल्या. कालमानानुरुप व्यवसाय वा उत्पन्नाचे साधन म्हणून शेतीला दुय्यमच नव्हे तर कनि÷ स्थान मिळत गेले. मात्र आता या साऱयाच व्यावसायिक दृष्टीकोनांमध्ये व्यावहारिक बदल होत असून शेतीसह कृषी क्षेत्राला पुन्हा सुगीचे दिवस लाभण्याची प्रक्रिया सुरू झालेली दिसून येत आहे. त्याचाच हा मागोवा.
कृषी क्षेत्रात झालेल्या बदलांचे थोडक्मयात वर्णन करायचे म्हणजे हे बदल ट्रक्टरपासून टेक्नॉलॉजीपर्यंत व सहकारी शेतीपासून व्यावसायिक शेतीपर्यंत अशा लक्षणीय स्वरुपात झाले आहेत. या बदलांमध्ये कृषी-विज्ञानाला अभियांत्रिकी-तंत्रज्ञानाची चपखल साथ मिळाल्यानेच या बदलांना चालना मिळून त्यांचे चांगले परिणाम आता दिसू लागले आहेत. या बदलांच्या प्रक्रियेला विज्ञानासह माहिती-तंत्रज्ञानाची साथ प्रयत्नपूर्वक व सातत्याने मिळत गेली, हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.
शेतीसह कृषी क्षेत्राला अद्ययावत व उपयुक्त बनविण्यासाठी कृषी तंत्रज्ञान विद्यापीठ, संशोधन संस्था व संशोधकांनी मिळून विशेष कामगिरी केली आहे. परिणामी वारे-वातावरणाचा अंदाज, वेळी-अवेळी येणारा पाऊस, पर्जन्यमान, या साऱयांचा पीक-पाण्यावर होणारा परिणाम इत्यादींची माहिती संगणकीय पद्धतीपासून उपग्रहांपर्यंतच्या प्रगत माध्यमातून देण्यात येत असल्याने त्याचा फायदा शेती आणि शेतकरी या उभयतांना होत आहे. या अभ्यासपूर्ण अंदाजामुळे शेतकऱयांना दोन मोसमात ज्या अनिश्चिततेला सामोरे जावे लागते व अधिकांश वेळा नुकसानीचा सामना करावा लागतो, त्यावर तोडगा निघणे ही बाब आता बऱयाच प्रमाणात दृष्टीपथात आली आहे.
यासंदर्भात काही शेतकऱयांचे प्रयत्न, स्वानुभव व त्यांना झालेले लाभ पडताळून घेणे म्हणूनच सर्वांसाठी मार्गदर्शक ठरते. यासंदर्भात बेंगळूरजवळील संग्रामेश तालिकोटी या प्रयत्नशील शेतकऱयाचे उदाहरण महत्त्वाचे ठरते. 80 वषीय या शेतकऱयाने शेतीच्या संदर्भातील परंपरागत व पिढीजात ज्ञान आणि त्याला प्रगत तंत्रज्ञानाची साथ या कृषी पद्धतीचा अवलंब करण्याचे ठरवून त्यानुसार प्रयत्न सुरू केले.
गेल्या वषी संग्रामेशने 38 हजार रुपये खर्चून आपल्या अडीच एकरातील टोमॅटो शेतीसाठी 3 सेन्सर्स खरेदी केले. यासाठी त्यांनी शास्त्राrय पद्धतीने अभ्यासही केला. याकामी त्यांना बेंगळूर येथील ऍग्रो-टेक स्टार्टअप ‘फसल’चे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले. त्यांना त्यांच्या पिकाच्या संदर्भातील माहिती, सद्यस्थिती व तंत्रज्ञान इत्यादीची माहिती अद्ययावत व पूर्वसूचना स्वरुपात मिळू लागली. मुख्य म्हणजे ही माहिती त्यांना त्यांच्या बसल्याजागी व स्मार्टफोनद्वारा मिळू लागली.
शेतातील सेन्सर्सच्या माध्यमातून आता संग्रामेश यांना त्यांची शेती आणि पिकाच्यादृष्टीने अभ्यास करून शेतीला पाणी देण्यासाठी ओलिताचे नियोजन, ओलिताचे प्रमाण, टोमॅटोवरील किडे-कीटकांचा प्रादुर्भाव, निगराणी, पिकाच्या तोडणीची आखणी व त्याची अंमलबजावणी इत्यादीची अचूक माहिती वेळेत मिळते. त्यामुळे अधिकांश प्रमाणातील पीकविषयक अनिश्चिततेवर संग्रामेश यांना मात करणे आता सहजशक्मय झाले आहे. शेतात खतांची फवारणी-तोडणी इत्यादीसाठी सर्वसाधारणपणे केव्हा आणि किती मजूर नेमावे लागतील याचा व्यावहारिक अंदाज ते लावू शकतात. टोमॅटोसारख्या नाजूक व खर्चिक पिकाच्या संदर्भात अशा अचूक व वेळेत घेतलेल्या निर्णयांमुळे संग्रामेश यांचे नुकसान मोठय़ा प्रमाणात आटोक्मयात येण्याचा मोठा फायदा त्यांना झाला.
शेतकऱयांमध्ये कृषीविषयक परंपरागत अनुमान आणि अनुभवाला ज्ञान-विज्ञानाची जोड देण्याबद्दल विशेष चोखंदळपणा वाढल्याने कृषी-स्टार्टअप उपक्रमांना आता बरकत आलेली दिसून येते. उदाहरणार्थ आज बेंगळूरच्या ‘फसल’ या कृषी स्टार्टअपमध्ये 30 कर्मचारी कार्यरत आहेत. ही बाब या बदलत्या परिस्थितीची परिचायक आहे. या कृषी स्टार्टअपचे संस्थापक व मुख्याधिकारी आनंद वर्मा यांच्या मते सध्या त्यांच्या स्टार्टअपचा मुख्य उद्देश शेतकऱयांना त्यांच्या शेतीविषयक प्रश्नांवर उपाययोजना सुचविण्याव्यतिरिक्त विशेषतः बागायती शेतीतून फलोत्पादनाला चालना देणे हा आहे.
‘फसल’ स्टार्टअपचे सध्याचे स्वरुप हे शेती व कृषी उत्पादन सल्लागार कंपनी असे आहे. कंपनीच्या कामकाजात त्यांनी संगणक तज्ञ, प्रयोगशाळा प्रमुख, फलोत्पादन मार्गदर्शक, विषय-तज्ञ-मार्गदर्शक, मार्गदर्शनासह प्रत्यक्ष सल्ला देणारे, माहिती संकलन व विश्लेषण करणारे इत्यादींचा समावेश केल्याने त्यांच्या प्रयत्नांना व्यावसायिक दिशा अल्पावधीतच मिळाली, हे विशेष.
‘फसल’ पाठोपाठ ऍग-स्मार्टिक, क्रॉप-इन यासारख्या कृषी-स्टार्टअप्नी देखील या क्षेत्रात आता यासंदर्भात व्यावसायिक पुढाकार घेतलेला दिसून येतो. या कृषी स्टार्टअप कंपन्या आता प्रकल्प व्यवस्थापन तत्व पद्धतीने शेती आणि शेतकऱयांसह अधिक शास्त्राrय व उपयुक्त पद्धतीने काम करीत असतात. याचा फायदा शेतकऱयांना दुहेरी स्वरुपात होतो. एक म्हणजे त्यांना तंत्रज्ञानासह तंत्रज्ञांचे मार्गदर्शन मिळते व दुसरे म्हणजे त्यांना शेतीच्या इतर कामांवर लक्ष देण्यासाठी वेळ मिळतो आणि त्याचा फायदाही होतो.
यासंदर्भात प्रमुख उदाहरण म्हणून पुणे जिल्हय़ातील आळेफाटा येथील हेमंत वाव्हळ या युवा शेतकऱयाच्या प्रयत्नांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. 35 वषीय हेमंत वाव्हळ यांनी यावषीच्या फेब्रुवारी महिन्यात आळेफाटा परिसरातील आपल्या दोन एकर शेतीतील डाळिंब शेतीत सेन्सर लावून घेण्याचे काम ‘फसल’ या कृषी स्टार्टअप कंपनीकडे सोपविले. त्यासाठी त्यांना सुमारे 86 हजार रुपये खर्च आला. मात्र, सेन्सर बसवून त्यांच्या मार्गदर्शनानुसार शेतातील डाळिंब शेतीच्या नेमक्मया कुठल्या भागात रासायनिक द्रव्याची फवारणी करायची? याचे नेमके आणि अचूक मार्गदर्शन लाभल्याने सेन्सर नंतरच्या डाळिंबाच्या पहिल्याच हंगामाने त्यांना चांगला हात दिला. या निवडक व प्रातिनिधिक स्वरुपांच्या उदाहरणांद्वारा प्रत्यक्षात स्पष्ट झालेली बाब म्हणजे शेतीला अनुभव व शिक्षणाशिवाय तंत्रज्ञानाची जोड दिल्यास त्याचा मोठा फायदा शेती आणि शेतकऱयांना होत असतो. यासाठी एकीकडे शासकीय स्तरावर विविध योजनांद्वारा सरकारतर्फे शेतकऱयांना आर्थिक मदतीसह मार्गदर्शन केले जात असतानाच कृषीविषयक मार्गदर्शक कंपन्या व त्यातही कृषी-स्टार्टअपद्वारा शेतकऱयांना त्यांच्या नेमक्मया व विशेष गरजांनुरुप मार्गदर्शन केले जाते. अशा ऍग्रो-टेक वा स्टार्टअप कंपन्यांची सतत वाढणारी संख्या व त्यांचा वाढता व्याप ही बाब याचीच परिचायक आहे. कृषी क्षेत्रातील ऍग्रो स्टार्टअप कंपन्यांमुळे कृषी विषयातील शिक्षित व प्रशिक्षितांना व त्याद्वारा शेतकऱयांना शेतीतील जोखीम व नासाडी कमी करून आपले उत्पन्न वाढविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
– दत्तात्रय आंबुलकर