कोरोना महामारीमुळे गतवषी उणे 24 असा नकारात्मक सकल राष्ट्रीय उत्पादनाचा अर्थात जीडीपीचा नीचांक गाठल्यानंतर यंदाच्या आर्थिक वर्षाच्या सरलेल्या पहिल्या एप्रिल ते जून 2021 या तिमाहीत 20.1 टक्क्यांची सकारात्मक वाढ नोंदविण्यात भारताला यश आले आहे. केंद्रीय सांख्यीकी कार्यालयाने मंगळवारी अधिकृतपणे जाहीर केलेली ही आकडेवारी रिझर्व्ह बँकेने अनुमान केलेल्या 21.4 टक्क्यांच्या दरापेक्षा कमी नोंदली गेली असली तरी आनंद आणि उत्साहाचे वातावरण तयार करणारी आहे. 2011-12 च्या स्थिर किमतीच्या आधारे यंदाच्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादन 32.38 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज बांधला आहे, तर गेल्या वषी याच तिमाहीत तो 26.95 लाख कोटी रुपये होता. त्याचप्रमाणे सरलेल्या तिमाहीत सकल मूल्यवर्धन हे 18.8 टक्क्यांच्या वाढीसह 30.48 लाख कोटी रुपये राहिले, जे गत वषी याच तिमाहीत 25.66 लाख कोटी रुपये होते. गेल्या अर्थ वर्षात कोरोनाने दिलेला पहिला तडाखा, त्यामुळे पूर्णतः ठप्प झालेली अर्थव्यवस्था यांचे पडसाद सकल राष्ट्रीय उत्पन्न घटणे अभिप्रेतच होते आणि ते उणे 24.4 टक्के पर्यंतच्या नीचांकी पोहोचले होते. या दरम्यानच्या काळात देशाने अनेक स्थित्यंतरे पाहिली आणि त्याचबरोबरीने संकटातून संधी शोधण्याचा प्रयत्नही झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या विचाराला आणि देशवासीयांच्या एकत्रित प्रयत्नांना चांगले फळ आले आहे. एप्रिल ते जून या 2021 सालातील पहिल्या तिमाहीच्या अशा उत्साहवर्धक यशानंतर यापुढे देशात आर्थिक आणि औद्योगिक उपक्रम कोणत्याही अडथळय़ाविना सुरू राहतील असा विश्वास व्यक्त करायला हरकत नाही. पहिल्या लाटेच्या प्रचंड मोठय़ा तडाख्यानंतर दुसऱया लाटेत आपला देश सावरला आहे. आपण साथीच्या दुसऱया लाटेचा सामना उत्तम पद्धतीने केला आहे हेच या यशातून दिसून येते. गतवषीच्या सलग तीन तिमाहीमध्ये नकारात्मक जीडीपी वाढ आणि जानेवारी ते मार्च 2021 या अंतिम तिमाहीत 1.6 टक्के सकारात्मक नोंदवलेली वाढ, या वषीच्या पहिल्या आर्थिक वर्षाच्या तिमाहीमध्ये वीस टक्क्मयांवर पोहोचली याचा अर्थ देशातील व्यापार, उद्योग, हॉटेल, वाहतूक, कृषी आदी क्षेत्रांमध्ये व्यवहार सुरळीत होत चालले आहेत. दुसऱया लाटेत देशाने जपून वाटचाल केली. पहिल्या लाटेपेक्षा रुग्ण संख्या जवळपास दुप्पट पोचली असतानाही ही कामगिरी झाली हे लक्षात घेतले तर कोरोनासह जगणे सक्तीचे असतानाही त्यातून वाट काढत देशाने चांगली वाटचाल केली आहे, असेच म्हणता येईल. सप्टेंबर महिना चालू झाला असून वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ञांनी कोणत्याही प्रदेशातून तिसऱया लाटेला सुरुवात होऊ शकते असा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रात पुण्यासारख्या महापालिकेने तातडीने खाजगी दवाखान्यांना महापालिकेकडे वर्ग करण्याची तयारी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अशावेळी या आव्हानाला तोंड देण्यासाठी आपली यंत्रणा सज्ज होत आहे हे लक्षात घेऊन न डगमगता स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घेत समाजाला आता ही वाटचाल करणे शक्मय आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. जीडीपीमधील ही प्रगती आणि दुसऱया बाजूला सेन्सेक्सने घेतलेली उसळी म्हणजे बाजाराने दिलेला प्रतिसादच म्हटले पाहिजे. सेन्सेक्सने 57 हजाराचा टप्पा ओलांडला तर निफ्टीने 17 हजाराचे शिखर गाठले. या वाढीमुळे बीएसईने नोंदविलेल्या सर्व शेअरचे भांडवली बाजारमूल्य इतिहासात प्रथमच 250 लाख कोटी रुपयांवर गेले. एक दिवस आधी हे मूल्य 247.30 लाख कोटी रुपये होते. त्यात 2.68 लाख कोटींनी वाढ झाली. ‘सेन्सेक्स’ने व्यवहारादरम्यान 57 हजार 625 अंशांचा उच्चांक गाठल्यावर हे बाजारमूल्य 250 लाख कोटींवर गेले होते. ‘एनएसई वरील 50 प्रमुख शेअरपैकी 42 शेअरचे भाव वधारले. शेअर्समधील ही वाढ अनेकांना अनाकलनीय वाटत आहे. खुद्द रिझर्व्ह बँकेनेही त्याबाबत भाष्य केलेले होते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी याबाबतची जोखीम लक्षात घेऊनच सावधगिरीने गुंतवणूक करण्याचा हा काळ आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. नफा वसुलीसाठी विक्रीतून शेअर बाजार अनेकदा कोसळतानाही अनुभवास आला आहे. मात्र सध्याच्या वाढीच्या काळात या घटकांकडे गुंतवणूकदारांनी दुर्लक्ष करणे हिताचे नाही. या वाढीला डोळसपणे घेण्यात त्यांचे हित आहे. देशाच्या जीडीपीवाढीचा परिणाम एकूणच औद्योगिक वातावरणावर होणार आहे. सर्वसामान्य शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्गाच्या हातात जर पैसा आला तर तो साठून न राहता बाजारात येतो आणि अर्थ चक्राला गती मिळते, हा नेहमीचाच अनुभव आहे. त्यादृष्टीने सर्वसामान्यांच्या हातात पैसा आल्यानंतर ते काय करतात याबाबतचे अनेक अभ्यास यापूर्वी प्रसिद्ध झालेले आहेत. त्यानुसार जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीबरोबरच चैनीच्या वस्तू आणि मनोरंजनावर सर्वसामान्यांचा मोठा खर्च होत असतो, हेही दिसून आले आहे. त्यामुळे या बदलाचा विचार करून वेगवेगळय़ा ठिकाणच्या राज्य सरकारांनी मनोरंजनाचे क्षेत्र खुले करणे गरजेचे बनले आहे. गेली दीड वर्षे या क्षेत्रातील ठप्प झालेला व्यवहार सुरळीत झाल्यास कलावंत, कामगारांपासून ते या उद्योगावर अवलंबून असणाऱया नोकरदार श्रमिक आणि कारागिरांचे जीवनही सुरळीतपणे सुरू होऊ शकते. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार अद्यापपर्यंत सिनेमागृहे आणि चित्रपटगृहे सुरू करण्यास राज्य सरकार तयार नाही. मात्र निम्म्यासंख्येने का होईना ते सुरू करावे अशी मागणी जोर धरत आहे. त्याला सरकारकडून प्रतिसाद मिळण्याची आवश्यकता आहे. लसीकरणाने सध्या वेग घेतला असला तरी तो पुरेशा प्रमाणात नाही. युरोपियन देशांनी लसीकरण पूर्ण केल्यामुळे त्यांच्या देशात क्रीडा स्पर्धा सुरू करण्याला परवानगी देण्यात आली. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेमुळे जगामध्ये एक प्रकारचे चैतन्यदायी वातावरण आहे, भारताला त्या स्थितीला पोहोचायचे असेल तर सध्याच्या स्थितीचा फायदा घेऊन भारतीय माणसाचे जीवनमानही गतिमान करावे लागेल. सामाजिक आंतर पाळण्याचे बंधन सक्तीने पाळायला लावून जर जीवन गतिमान झाले तर भारताची अपेक्षित प्रगती सुरू होण्यास विलंब लागणार नाही.
Previous Articleदोन हजारांची लाच घेताना तलाठी जाळ्यात
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.