कोल्हापूर / प्रतिनिधी
इस्पुर्ली तालुका करवीर येथील तांबेकर वडा दरम्यान शॉर्टसर्किटने आग लागल्याने सुभाष बाजीराव तांबेकर या शेतकऱ्याचे सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये शेतात जोडलेली बोरवेल जनावरांसाठी कापून ठेवलेले वैरण शेणखताचे दोन ढीग आणि इंधन म्हणून उपयोगाला येणारे जळावू लाकूड यांचा समावेश आहे.
शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार दुपारी साडेबाराच्या दरम्यान डाग नावाच्या शेतात जवळ असलेल्या महावितरणच्या डीपीमुळे शॉर्टसर्किटने आग लागून ही आग दोनशे मीटर अंतरावर असणाऱ्या बोरवेल जळून खाक झाली. यामध्ये शेतकऱ्याने दोन महिन्यापूर्वीच जोडलेल्या बोरवेल पंप आणि वायर संपूर्ण जळाल्यामुळे तो बोरवेलमध्ये पडला आणि उरलेले साहित्य हे जळून भस्मसात झाल्याचे माहिती शेतकऱ्याने दिली. तसेच यापूर्वी ही सुमारे दोन वेळा आपला ऊस जळाल्याचे आल्याचे शेतकऱ्यांने बोलताना सांगितले.
तसेच महावितरणला सुमारे तीन वर्ष लाईट विज कनेक्शन साठी अर्ज करून ही महावितरणने वेगवेगळी कारण देत शेतकऱ्यांना कनेक्शन पासून दूर ठेवले आहे. यामुळे बोरवेल चा एक महिन्यापूर्वीच जोडलेला ठेवलेला नवीन पंप न वापरताच आगीत भस्मसात झाल्याचे शेतकऱ्यांनी या वेळी बोलताना सांगितले.
या आगीला विजवण्यासाठी सुमारे दहा ते पंधरा जणांनी अथक प्रयत्न केल्यानंतर साडेतीनच्या दरम्यान आग आटोक्यात आली तोपर्यंत सुभाष तांबेकर या शेतकऱ्यासोबत राजाराम गुंडू तांबेकर यांचा अर्धा एकर ऊस जळून खाक झाला आहे. ही आग एवढ्यावरच न थांबता पुढे इस्पुर्ली गावठाण भागात शिरल्यामुळे दुपारी चार पर्यंत पाच एकर गावठाण ही जळाले आहे. यात वृक्षलागवड या अंतर्गत नवीन केलेली वृक्ष रोप नुकतीच लावलेली जंगली झाडे आणि नैसर्गिक प्राण्यांचे निवारे ही जळून खाक झाले आहेत.
ही घटना घडल्याची माहिती मिळताच महावितरणचे कनिष्ठ अभियंता पाटील यांनी घटनास्थळी भेट देत झालेल्या नुकसानीची पाहणी केली व त्याबद्दल गाव कामगार तलाठी यांनी रितसर पंचनामा केल्यानंतर महावितरण याबद्दल शेतकऱ्याला योग्य तो मोबदला देईल अशी शाश्वती दिली. ही शाश्वती दिली असली तरी जळून खाक होण्यापूर्वीच योग्य ती काळजी महावितरण घेतली असती तर शेतकऱ्यांचे नुकसान झाले नसते असे म्हणत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी हातबलतेने हात टेकले. त्यामुळे नुकसान झाल्यानंतर त्याचा मोबदला महावितरणने देण्यापेक्षा योग्य वेळी आवश्यक ती काळजी घेऊन शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांनी या वेळी बोलताना सांगितले