ऑनलाईन टीम / मुंबई :
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचे पुत्र फरहान आझमी यांनी वादग्रस्त विधान केले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असतील तर मीही त्यांच्यासोबत अयोध्येला जाईन, व त्या ठिकाणी मशीद बांधणार, असे खळबळजनक विधान केले आहे. या वक्तव्यावरुन आता वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
फरहान यांचे म्हणणे आहे की, जर उद्धव ठाकरे अयोध्यामध्ये जाऊन राम मंदिर बांधणार असतील तर आम्हीसुद्धा अयोध्याला जाणार पण तिथे आम्ही बाबरी मशीद बांधणार. महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येला जाण्याचा निर्णय मुस्लिंमाना घाबरवण्यासाठी घेतला आहे.
पण मी त्यांना सांगू इच्छितो की, जगभरात 205 अब्ज लोकसंख्या आहे. त्यामध्ये 50 टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त मुस्लिम देश आहेत जे आम्हाला हसत-खेळत आमच्या देशात आम्हाला परत घेऊन जातील. पण आम्ही जाणार नाही, असे फरहान आझमी म्हणाले.