नवी दिल्ली
एअर इंडियाला विकण्याचा प्रस्ताव चालू महिन्यातच सादर होण्याची शक्यता आहे. मंत्री समूहाकडून (जीओएम) मंजुरी देण्यात आली आहे. मंगळवारी गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय देण्यात आला आहे. सरकार एअर इंडियाची 100 टक्के हिस्सेदारी विकणार आहे. मागील वर्षात 76 टक्के समभाग विक्रीसाठी बोली लावण्यात आली होती. परंतु कोणीही खरेदीदार मिळाला नव्हता. यानंतर नियम व अटी बदलण्यात आलेत. एअर इंडिया मागील काही दिवसांपासून तोटय़ाचा सामना करत आहे. 2018-19 मध्ये कंपनीला 8,556.35 कोटी रुपयाचा तोटा(प्रोव्हीजनल) एअरलाईन्सवर 50,000 कोटी रुपयांहून अधिकचे कर्ज आहे. या कारणामुळे सरकार एअर इंडियाला विकण्याची तयारी करत आहे. मार्चपर्यंत विक्रीची प्रक्रिया पूर्ण करण्याची योजना आखण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले आहे.