ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात ऑगस्टच्या अखेरीस कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. मात्र, दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेचा परिणाम थोडा कमी असेल, असा अंदाज इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) डिव्हिजन ऑफ एपिडेमिओलॉजी अँड कम्फ्यूटेबल डिसिजेसचे प्रमुख डॉ. समीरिन पांडा यांनी व्यक्त केला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना डॉ. पांडा म्हणाले, कोरोनाची तिसरी लाट देशव्यापी असेल. मात्र ती भयावह आणि दुसऱ्या लाटेएवढी वेगवान नसेल. कोरोनाच्या डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटचे वाढते संक्रमण आणि राज्यांमधील लॉकडाऊनचे निर्बंध उठवण्याची घाई या तिसऱ्या लाटेला जबाबदार असू शकते.