कळंबा तलावाची पाणी पातळी पोहचली 18 फुटांवर, ऐन उन्हाळ्यात कळंबा गावसह शहराला बसणार पाण्याचा फटका, तलावाला गळती व बेसुमार पाणी उपसामुळे कळंबा तलावाची पाणी पातळी 18 फुटावर, महालपलिकेसह ग्रामपंचायतीने नियोजन करण्याची नागरिकांतून मागणी
महापालिकव कळंबा ग्रामपंचायतीने तलावांमधील पाणी उपासाचे योग्य नियोजन केले नाही तर कळंबा गावाला ऐन उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. मार्च पर्यंत पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक असून , तलावाची पाणी पातळी 18 फुटांवर पोहोचली असून जलचरांचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी तलावांतून आठ फूट पाणी उपसा करावा लागणार आहे.
सागर पाटील /कळंबा
फेब्रुवारी च्या सुरवातीलाच उन्हाळा चटके बसायला सुरवात होत असतानाच कळंबा तलावातील पाणीसाठा मात्र झपाट्याने कमी होत चालला आहे. तलावाची पाणी पातळी फेब्रुवारी आज अखेर 18 फुटांपर्यंत गेली आहे. गेल्या वर्षी पाणीपातळी व आताची पाणी पातळी पाहता ती फेब्रुवारीत ती 20 फुटांवर होती. त्यामुळे यंदा कळंबा गावालाही ग्रामपंचायतीने एक दिवस आड पाणी पुरवठा करण्यास सुरवात केली आहे.
फेब्रुवारी महिन्यातच आत्ताच ही वेळ आल्यानेअजून तीन ते चार महिने पावसाळा सुरवात होईल पण कळंबा गावसह काही दिवसांनी कोल्हापूर शहरालाही याची झळ बसणार आहे. तलावाची गळती व बेसुमार पाणी उपसामुळे कळंबा तलावातील 40 टक्के पाणीसाठा कमी झाला. तलावाचे पश्चिम व दक्षिण बाजूस पात्र मोठ्या प्रमाणात कोरडे पडू लागले आहे. महापालिका व कळंबा ग्रामपंचायतीने तलावांमधील पाणी उपसाचे योग्य नियोजन केले नाही तर कळंबा गावाला ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, तलावाची पाणी पातळी 18 फुटांवर पोहोचली असून जलचरांचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी तलावांतून अजून आठ फूट पाणी उपसा करावा लागणार आहे. यंदा नोव्हेंबर ते डिसेंबर पर्यँत पाऊस पडल्यामुळे तलाव पाच वेळा ओसंडून वाहिला. त्यामुळे तलावात मुबलकअसा पाणी साठा झाला होता. त्यामुळे पाणी पातळी 27 फुटावर पोहोचली होती. मात्र चार महिन्यांत महापालिकेने तलावांमधून बेसुमार पाणी उपसा सुरू ठेवला आहे. त्याचबरोबर बंधारा नजीक शाहू कालीन पाटामधील गळतीतून दररोज लाखो लिटर पाणीसाठा वाहून ओढ्या नाल्यात वाया जात आहे. त्यामुळे तलावाच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस घट होत असून चार महिन्यांत नऊ फूट पाणीसाठा कमी झाला आहे.
तलावांमधून दररोज सात एमएलडी पाणी उपसा केला जात आहे. त्यात निम्म्या शहरासाठी महापालिका सहा लाख लिटर म्हणजे सहा एमएलडी पाणी उपसा करत आहे. तर कळंबा ग्रामपंचायत दररोज 14 लाख लिटर म्हणजे 14 एमएलडी पाणी उपसा करत आहे. दरम्यान, नागरी वहिवाट, उद्योग व हॉटेल व्यवसायातून निर्माण होणारे सांडपाणी ओढ्या नाल्याद्वारे तलावात मिसळते. दिवस उजाडल्यापासून मावळेपर्यंत पाळीव जनावरे मोठ्या प्रमाणात तलावात सोडली जातात. त्यामुळे पाणी प्रदूषण होते. तलावाचे काठ दलदलीने भरून गेले असून निर्माल्य, देव-देवतांचे फोटो, प्लास्टिक कचरा तलावाभोवती साचत आहे.
नागरिकांची गरज ओळखता भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असलेने तलावातील पाणी साठा आणखीन वाढवण्यासाठी लोकसहभागातून गाळ काढणे गरजे बनले आहे
कळंबा तलावातून या भागाला होतो पाणी पुरवठा
कळंबा ,व शहराच्या बी वार्ड मंगळवार पेठ , पाण्याचा खजिना, टिमबर मार्केट जुना वाशीनाक शिवाजी पेठ आदि या भागाला कळंबा तलावाला पाणी पुरवठा होतो या सह अधून मधून पचगावला ही पाणी पुरवठा तलावातून केला जातो.
नागरिकांनी आगामी पाणी टंचाई ओळखून पाण्याचे योग्य करावे उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नाही. महापालिका प्रशासनाने कळंबा व पचगाव ची संयुक्त अशी बैठक घेऊन तलावातील पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. कळंबा गावासाठी राखीव पाणी साठा शिल्लक ठेवून उपसा करावा, गरज पडल्यास तलावातून पाणी उपसा बंद करण्याचा आहे.- सागर भोगम, सरपंच, कळंबा