मुंबई/प्रतिनिधी
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर एकामागोमाग एक भ्रष्टाचाराचे आरोप करत सुटलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा कोल्हापूरला येणार असल्याचं म्हंटल आहे. सोमय्या यांनी येत्या मंगळवारी कोल्हापुरात येऊन अंबाबाईचे दर्शन घेणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या दौऱ्यावरून पुन्हा एकदा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अनिल परब, अनिल देशमुख अशा सत्ताधारी मंत्र्यांनंतर आता किरीट सोमय्या यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे वळवला आहे. त्यांनी मुश्रिफांवर १२७ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. किरीट सोमय्या सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते. दौऱ्यावेळी ते मुश्रीफांच्या साखर कारखान्याची पाहणी करणार होते. पण कायदा व सुव्यवस्थेच्या कारणासाठी कोल्हापूर दौरा रद्द केल्याने संतापलेल्या किरीट सोमय्या यांनी कराड इथं पत्रकार परिषद घेतली आणि आपल्या पुढच्या कामाची दिशा सांगितली.
यावेळी लवकरच मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा बाहेर काढणार तसंच याविरोधात ईडीकडे तक्रार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी बोलताना ते म्हणाले, हसन मुश्रीफ यांचे जावई हे ब्रिक्स इंडिया लिमिटेड या कंपनीचे बेनामी मालक आहेत. ही कंपनी आणि सरसेनापती कारखान्यामध्ये ५० कोटीची आर्थिक उलाढाल झाली आहे. या कंपनीत आलेले पैसे अपारदर्शक पद्धतीने आले आहेत. या व्यवहाराबद्दल काहीही माहिती नाही. एकूण १०० कोटींचा हा घोटाळा आहे, असे ते म्हणाले.
काय म्हणाले होते किरीट सोमय्या कोल्हापूरहून परतताना पाहा सविस्तर