शेतकऱयांना दिलासा देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशभरातील शेतकऱयांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने यंदा धान्य खरेदीत मोठी वाढ केली आहे. यंदा गेल्या वर्षीपेक्षा 22 टक्के अधिक धान्य खरेदी करण्यात आली असून यासाठी 80 हजार कोटी रूपये मोजण्यात आले आहेत.
या खरेदीचा प्रारंभ ऑक्टोबर 2020 मध्ये करण्यात आला. त्यानंतर डिसेंबरच्या मध्यापर्यंत 4 कोटी 22 लाख 1 हजार टन धान्य खरेदी झाली.
ही खरेदी भारतीय अन्न महामंडळ आणि राज्य स्तरीय संस्थांकडून करण्यात आली आहे. यावेळी केंद्राने किमान आधारभूत किमतीतही वाढ केल्याने आतापर्यंतच्या खरेदीतून 50 लाख 77 हजार शेतकऱयांचा लाभ झाला आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, तेलंगणा, गुजरात, तामिळनाडू, चंदीगड, उत्तराखंड, केरळ, आंध्र प्रदेश, ओडीशा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि जम्मू-काश्मीर या राज्यांमधून करण्यात आली.
धान्य खरेदीचा विचार करता यंदा सर्वाधिक धान्य खरेदी पंजाबमधून करण्यात आली.