प्रतिनिधी / सुमित तांबेकर
देशातील १०० श्रीमंत व्यक्तींकडे भारताच्या ४० टक्के नागरीकाइतकी संपत्ती आहे. त्यामुळे देशातील संपत्ती फक्त धनदांडग्यांकडे एकत्रित झाली असुन समाजात तीव्रतेने अर्थिक विषमता वाढीस लागली असल्याचे राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले. ते ११ फेब्रुवारी रोजी कुडतरे येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत बोलत बोते.
यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी गोव्यात न्याय योजना लागू करणार असुन या योजनेनुसार आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या कुटुंबांना प्रतिमहिना सहा हजार रुपये मिळतील असे ही ते म्हणाले.तसेच महिला सक्षमीकरणासाठी एक पाऊल पुढे टाकत असुन यासाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 30 टक्के आरक्षण देणार असल्याचे ही त्यांनी यावेळी जाहीर केले. या बरोबरच गोव्यातील पर्यटन ही अजुन सक्षम करणे ही अपेक्षित असुन त्याच्यावर ही काँग्रेस करणार असल्याचे गांधी यावेळी म्हणाले. तसेच गेली काही वर्ष खाणकाम बंद असल्याकारणाने गोव्यातील अनेक कुटुंबांची झालेली आर्थिक कुचंबणा झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात आपण गोव्यातील खाणकाम कायदेशीररित्या सुरु करणार असुन याचा फायदा गोवा राज्यातील सुमारे दोन लाख कुटूंबांना होणार असल्याचे ते म्हणाले.
तसेच सद्या गोव्यात जे चालु आहे ते लोकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेले आहे. बेरोजगारी, तसेच महागाईमूळे सामान्य लोकांना जीवन जगणे कठीण झाले आहे. तर गोव्याची अर्थव्यवस्था ही ढासळली असल्याने लोकांची अर्थिक कुंचबना झाली आहे. सामान्य नागरिकांच्या जीवनातील दैनंदिन गरजेच्या वस्तु भाजप सरकारने महाग केल्या असल्याने लोक महागाईने बेजार झाल्याचेही ते यावेळी म्हणाले.
तसेच कुडचडे मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार यावेळी म्हणाले कि येत्या १४ तारखेला मतदान आहे. त्यावेळी प्रत्येकाने विचार करून मतदान करा. आणि १० मार्च रोजी आपला वाढदिवस असल्याने कु़डचडेकर आपल्या वाढदिवसाची भेट निकालाद्वारे देतील अशी खात्री त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी चिदंबरम कर्नाटकचे माजी मंत्री आर व्ही देशपांडे, केपीसीसीचे अध्यक्ष सतीश जारकीहोळी तसेच कुडचडे मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अमित पाटकर यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते आणि गोव्यातील काँग्रेसचे उमेदवार उपस्थित होते.