लाखो रुपयांचे नुकसान : शॉर्टसर्किटने आग : शेतकऱयांच्या प्रयत्नाने आग आटोक्यात
वार्ताहर/ कोगनोळी
शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या भीषण आगीत दहा एकरातील ऊस खाक झाल्याची घटना रविवारी दुपारी 2 वाजता कोगनोळी (ता. निपाणी) येथे घडली. यामुळे शेतकऱयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेजारी व आसपास असणाऱया शेतकऱयांनी अन्य शेतातील ऊस तोडून आग विझवली. अन्यथा मोठय़ा नुकसानीला सामोरे जावे लागले असते.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, येथील खोत मळा खडकजवळ असणाऱया चौगुले मळय़ात दुपारी 2 वाजता विद्युत तारांमध्ये घर्षण होऊन उसाच्या शेताला आग लागली. काही वेळाने आगीने रौद्ररुप धारण केल्याने येथील शेतकरी डॉ. आण्णासाहेब चौगुले 60 गुंठे, शरद चौगुले 20 गुंठे, सुचिता पाटील 40 गुंठे, नितिन चौगुले 20 गुंठे, पद्मा पाटील यांचा 5 एकर अशा 10 एकरातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या आगीत शेतकऱयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
शाहू कारखान्याचे गट अधिकारी अविनाश मगदूम, सीताराम हेगडे, भरतेश खोत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे संचालक व माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी संबंधित कारखान्याच्या अधिकाऱयांना आग लागलेला ऊस लवकरात लवकर नेण्याच्या सूचना केल्या.