रत्नागिरीच्या सुपुत्राचा उच्च न्यायालयात लढा, शुक्रवारी होणार पुढील सुनावणी,
रत्नागिरी / प्रतिनिधी
चाकरमानी मुंबईकर मोठय़ा प्रमाणात रत्नागिरी जिह्यात आलेले आहेत. कोविड चाचणीसाठी नमुने घेतले जात आहेत. रत्नागिरी जिह्यात तपासणी प्रयोगशाळा उभारली जावी म्हणून मान्यतेची विनंती करणारा एक प्रस्ताव आला आहे. तथापि प्रयोगशाळा सुरु न होणे हे राज्याच्या आरोग्य विभागाचे अपयश आहे. आता साराज्य राज्यभरासाठीच या याचिकेची व्याप्ती वाढवण्यात येईल अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिह्यात मोठय़ा प्रमाणावर चाकरमानी दाखल होत असताना घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी घेतले जात आहेत. तथापि त्यांची तपासणी मिरज व अन्य ठिकाणी करण्यात येते. या प्रयोगशाळांच्या क्षमता केव्हाच संपून गेल्या आहे. म्हणून रत्नागिरी जिह्यात अशी प्रयोगशाळा सुरु करण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावेत म्हणून खलिल वस्ता यांच्यातर्फे ऍड. राकेश भाटकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. ऍड. भाटकर हे रत्नागिरीचे सुपुत्र आहेत.
मंगळवारी या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमुर्तींच्या उपस्थितीत सुनावणी झाली. त्यावेळी राज्य सरकारच्यावतीने सांगण्यात आले की, डेरवण येथील वैद्यकीय महाविद्यालयाने पेंद्र सरकारकडे प्रयोग शाळेच्या मान्यतेचा प्रस्ताव सादर केला. तथापि त्याची पूर्तता महाविद्यालय करु शकले नाही. यामुळे जिह्यात प्रयोगशाळा नाही. न्यायमूर्तींनी सांगितले की हे राज्य सरकारचे अपयश आहे. केवळ रत्नागिरी, सिंधुदुर्गपुरता मुद्दा नाही तर राज्यभराचे काय? आम्ही या याचिकेची व्याप्ती वाढवून ती पूर्ण राज्यभरासाठी करत आहोत. शुक्रवारपर्यंत सरकारने प्रयोगशाळा उभारणीविषयीच्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा.
ऑनलाईन स्वरूपाच्या सुनावणीवेळी ऍडव्होकेट राकेश भाटकर म्हणाले, शुक्रवारी शासनाने सकारात्मक गोष्ट न्यायालयासमोर सांगावी. यावर न्यायाधिश म्हणाले, मुद्दा गंभीर आहे. तुम्ही काळजी करु नका. आम्हीच त्या संदर्भात आढावा घेऊ. विशेष बाब म्हणजे सोमवारी राज्य सरकारने रत्नागिरीत कोविड लॅबसाठी 1 कोटी रूपयांहून अधिक रक्कम मंजूर केली असल्याचा शासन निर्णय जारी केला. तथापि त्याबद्दल सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयात काहीही सांगितले नाही.