सांगली: प्रतिनिधी
कोरोनाबाबत अनेक समज गैरसमज आहेत. पण या आजाराबाबत असलेली अनाठायी भिती जशी धोकादायक आहे तशी बेफिकीरीही धोकादायकच आहे. अजूनही एचआयव्ही आणि रेबीजसारख्या आजारांवर पण लस उपलब्द नाही. कोरोनावर लवकर लस निघण्याची शक्यता नाही. त्यामुळे स्वत:ची रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, काळजी घ्या, असे मत डॉ. विश्वनाथ पाटील यांनी व्यक्त केले.
नवभारत शिक्षण मंडळ संचलित सर्व शाखांच्यावतीने आज स्वातंत्र्यदिनानिमीत्त डॉ. पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सभासद अशोक पाटील होते.
डॉ. पाटील यांनी सांगितले की, आजवर अनेक साथीचे आजार आले, पण कोरोनाने सार्या जगाच्या जनजीवनावर परिणाम केला. जागतिक घडामोडी ठप्प झाल्या. चिनने जैवीक अस्त्र म्हणून कोरोनाची निर्मीती केली असाही आरोप केला जातो आहे, पण आज चीनने त्यावर मात करत सारे व्यवहार सुरु केले आहेत.
कोरोनाचा विषाणू इतरांच्या शरीरात जीवंत राहतो. खोकला-थूंकीतून तो पसरू शकतो, म्हणूनच तो आपल्या शरीरात येऊ नये यासाठी योग्य अंतर राखले पाहिजे, मास्क आणि सॅनिटायझरचा वापरले पाहिजे. टेस्ट निगेटिव्ह आली म्हणजे कोरोना नाही असेही नाही. अनेक कारणांनी ती निगेटीव्ह येऊ शकते. पण असे असले तरी कोरोना म्हणजे जीवाला धोका अशीही भिती बाळगण्याचे कारण नाही, असे त्यांनी सांगितले.
स्वागत संचालक गौतम पाटील यांनी केले. आभार उपसंचालक डी.एस.माने यांनी मानले. कार्यक्रमास प्रशासकीय अधिकारी एम.के.अंबोळे यांच्यासह सर्व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Trending
- निवडणूक प्रचारात ‘पाकिस्तान’ची एंट्री
- दिल्ली महिला आयोगाचे 223 कर्मचारी बडतर्फ
- पश्चिम बंगालमध्ये कोणाचा वरचष्मा…
- सर्वेक्षणाच्या नावावर मतदारांची नोंदणी बंद करा
- ब्रिजभूषण यांच्याऐवजी पुत्राला भाजपची उमेदवारी
- कॉग्निझंटचा तिमाही नफा 6 टक्क्यांनी नुकसानीत
- वादळ-पावसाचा युएईला पुन्हा तडाखा
- इंडियन ऑइलच्या नफ्यात लक्षणीय घट