नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि संसर्गाचा धोका यामुळे संसदेचे हिंवाळी अधिवेशन स्थगित करण्यात आले आहे. ही घोषणा संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मंगळवारी केली. काँगेस नेते आणि खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवून हिंवाळी अधिवेशन अल्पकालीन करण्याची मागणी केली होती. मात्र, सरकारने हे अधिवेशनच स्थगित केल्याची माहिती चौधरी यांना कळविण्यात आली आहे, असे जोशी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ात अर्थसंकल्पीय अधिवेशनच घेण्यात येईल. 1 फेब्रुवारी 2021 या दिवशी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.