प्रतिनिधी / कोल्हापूर
रविवारी पहाटे राजाराम तलावात एका तरुणीचा मृतदेह आढळून आला. आहे. ऐश्वर्या बाळकृष्ण चव्हाण (वय 22 रा. म्हाडा कॉलनी, उजळाईवाडी, गोकुळ शिरगाव) असे तिचे नाव आहे.
ऐश्वर्या चव्हाण ही आपल्या आई वडिलासोबत उजळाईवाडी येथे राहत होती. 12 मे रोजी रात्री ऐsश्वर्याने वडीलांच्या डोळयात ड्रॉप टाकला. त्यानंतर अभ्यास करायला जातो असे सांगून गेली. रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास तिच्या आईने तिच्या वडीलांना ऐश्वर्या घरात नसल्याची माहिती दिली. यानंतर घरातील सर्वांनी तिचा शोध घेतला. पण सापडली नाही. यामुळे बाळकृष्ण चव्हाण यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात आपली मुलगी ऐश्वर्या बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.
दरम्यान, रविवारी (23 मे ) पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास राजाराम तलाव परिसरात फिरायला लोकांना तलावातील पाण्यावर तरुणीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. नागरिकांनी राजारामपुरी पोलीसांना या घटनेची माहिती दिली. यानंतर राजारामपुरी पोलीसांनी घटनास्थळी जावून मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. तिची ओळख पटल्यावर तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. राजारामपुरी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.