-पालकमंत्री सतेज पाटील यांचा महाडिकांना टोला
प्रतिनिधी/कोल्हापूर
पुणे येथील जावयाचा गोकुळचा ठेका गेल्याने त्यांना दु:ख झाले असावे, म्हणून सत्ताधारी गटावर काहीतरी आरोप सुरु आहेत. अशी खरमरीत टिका पालकमंत्री सतेज पाटील यांनी महाडिक यांचे नाव न घेता केली. तर अमुलला बळ देण्यासाठी त्यांना आतापर्यंत गोकुळच्या विस्तारीकरणात खोडा घातला होता असा आरोपही त्यांनी केला. सभेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले आम्ही शेतकऱयांचा विकास हे एकच ध्येय घेऊन गोकुळमध्ये आलो आहोत. आम्ही आमच्या भूमिकेवर आजही ठाम आहोत. वासाचे दूध राजकीय सुडबुद्धीने काढले जात नाही. ते यात बदल होणार नाही उत्पादकांना दोन रुपये जाद दर देण्याचे वचन पूर्ण केले आहे. आता भविष्याची गरज ओळखून विस्तारीकरणाचे काम हाती घेतले आहे. ते कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करु तथापि हे या पूर्वीच व्हायला पाहिजे होते. कदाचीत अमुलला संधी देण्यासाठी यापूर्वीच्या मंडळीनी निर्णय घेतला नाही. अशी टीका पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. सभेपूर्वी महाडिक यांच्याकडून आरोप होत आहेत यावर त्यानी जावयाचा ठेका गेल्याने त्यांना दु:ख झाले असावे असा टोला लगावला. तर भाजपने सरकार अस्थिर करण्यासाठीच मंत्री मुश्रीफ यांच्यावर आरोप केले आहेत. किरीट सोमय्या यांनी जिल्हÎातील शांतात भंग करण्यासाठी येऊ नये असे आवाहनही त्यांनी केली.