वार्ताहर / चंदुर
नुकत्याच जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावातील दोन गटात थेट लढत होणार आहे. चंदूर गाव अतिसंवेदन गाव म्हणून ओळखले जाते. या पूर्वीही निवडणुकीच्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात वादावादी सह मारामारी झाल्याचे प्रकार झाले आहेत. अशाच पद्धतीचा प्रकार नुकताच झाला आहे आर्थिक देवाण घेवाण चे कारण दाखवत दोन्ही गट मंगळवारी रात्री उशिरा शाहूनगर परिसरात समोर समोर येऊन वादावादी होऊन तणाव निर्माण झाला होता.
यातील काही जणांना ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात समज देऊनही असा प्रकार घडला आहे.त्यामुळे परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.