ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारत सरकारने चिनी नागरिकांच्या भारत यात्रेवर निर्बंध घातले आहेत. चिनी प्रवाशांना विमानात घेऊ नका, असे देशातील सर्व एअरलाईन्सला अनौपचारिक आदेश देण्यात आले आहेत.
मागील काही दिवसांपासून भारत-चीनमधील विमानसेवा बंद आहे. मात्र, चिनी नागरिक व्यापार, नोकरी अथवा इतर कारणांसाठी दुसऱ्या देशातून भारतात येत आहेत. त्यामुळे अशा चिनी नागरिकांना विमानात प्रवेश देऊ नये, असे सरकारचे म्हणणे आहे.
कोणत्याही परिस्थितीत चिनी प्रवाशांना भारतात येण्यासाठी परवानगी देऊ नये, अशा सूचना भारत आणि परदेशी विमान सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना भारत सरकारने दिल्या आहेत.