मुख्य कार्यकारी विनय गौडा,सुट्टीच्या दिवशीही कार्यशाळा उत्साहात
प्रतिनिधी/सातारा
जिह्यातील प्रत्येक कुटुंबास थेट नळाद्वारे पाणी मिळाले पाहिजे. किमान दर दिवसाला प्रति माणसी 55 लिटर शुद्ध पाणीपुरवठा करण्यात आले पाहिजे. जल जीवन मिशन हा जिल्हा परिषदेचा प्राधान्याचा विषय असल्याने त्याची कार्यवाही तात्काळ करावी, अशा सुचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सर्व अभियंत्यांना दिल्या.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद सातारा यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जिल्हा परिषद सातारा येथे कार्यालयीन सुट्टीच्या दिवशी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यशाळेस ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील शिंदे, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते हे उपस्थित होते. जल जीवन मिशन हा केंद्र शासनाचा अत्यंत महत्त्वाचा म्हणजेच फ्लॅगशिप कार्यक्रम असल्याने जिह्याचा प्राधान्याचा विषय आहे प्रत्येक कुटुंबाला 55 लिटर शुद्ध व स्वच्छ पाणी दररोज द्यावयाचे आहे प्रत्येक गावाचा गाव कृती आराखडा तयार करावा सर्व वाडय़ा वस्त्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध आहे सातत्याने पाणीपुरवठा होण्यासाठी स्रोत बळकट करण्याची कामे केल्याशिवाय हे उद्दिष्ट साध्य होणार नाही तसेच पाणी गुणवत्ता चांगली राखण्यासाठी घनकचरा वङ ङसांडपाणी व्यवस्थापनाची कामे करावीत असे आवाहन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकायांनी केले या वेळी पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते यांनी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन याविषयी सखोल मार्गदर्शन करून शाळा अंगणवाडी नळकनेक्शन बाबत आढावा घेतला ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता सुनील शिंदे यांनी जल जीवन मिशन मधील तांत्रिक मार्गदर्शन करून मार्च 2022 पर्यंत सर्व गावांची कामे पूर्ण करावीत असे आवाहन केले. तसेच; शाखा अभियंता अभिजीत जोशी यांनी जल जीवन मिशन चे सर्व शासन निर्णय समजावून सांगितले. अभियंता संजय लाड यांनी अचूक अंदाजपत्रके तयार करणे बाबत मार्गदर्शन केले. संजय पवार यांनी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाचे विविध पर्याय व याविषयी मार्गदर्शन केले. श्रीमती गुरव यांनी केंद्र शासनाच्या जल जीवन मिशनच्या वेब पोर्टल वरील नोंदी करण्याचे ऑनलाईन प्रशिक्षण दिले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन पाणी स्वच्छता विभागातील प्रसिद्धी तज्ञ अजय राऊत व प्रास्ताविक पाणी स्वच्छता विभागातील तज्ञ राजेश भोसले यांनी केले. तसेच पाणी स्वच्छता विभागातील तज्ञ धनाजी पाटील यांनी आभार मानले.