अद्याप 31 कुटुंबे वाऱयावर, मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
लोकसभा पोटनिवडणुकीदरम्यान शिक्षक तसेच सरकारी कर्मचाऱयांनी काम केले. त्यामुळे अनेकांना कोरोनाची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाला. मात्र त्यांच्या कुटुंबियांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही. जिह्यामध्ये एकूण 39 सरकारी कर्मचाऱयांचा मृत्यू झाला आहे. त्यामधील केवळ 8 कुटुंबांना नुकसान भरपाई मिळाली आहे. अजून 31 जणांच्या कुटुंबियांकडे सरकारने दुर्लक्ष केले असून तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी रामदुर्ग येथील भालचंद्र जबशेट्टी यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन पाठवून ही मागणी केली.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सरकारने केवळ निवडणुकीच्या काळातच मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई दिली आहे. वास्तविक 17 एप्रिल रोजी निवडणूक झाल्यानंतर काही दिवसांनी अनेकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र त्यांना नुकसान भरपाई दिली गेली नाही. ही बाब अत्यंत गंभीर आहे.
उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक काळात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला त्या सरकारने नुकसान भरपाईबरोबरच त्यांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरीही दिली आहे. उत्तर प्रदेशमध्ये हा न्याय दिला असताना कर्नाटक राज्यामध्ये का नाही, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. पोटनिवडणुकीमध्ये कोरोना काळात सर्वांनी काम केले. निवडणुकीनंतर त्यांचा काही दिवसांनी मृत्यू झाला. परंतु या कालावधीतच व मतमोजणीवेळी या कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली. तेंव्हा या 31 कुटुंबांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जबशेट्टी यांनी केली.