प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये एसटीच्या फेऱयांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली असल्याचे दिसून येत आह़े सोमवारी जिह्यात 400 हून अधिक फेऱया रत्नागिरी विभागाला यश आल़े एसटीचे चालक व वाहक मोठय़ा संख्येने कामावर हजर होत असल्याचे दिसून येत आह़े तब्बल 170 चालक वाहक कामावर हजर झाल्याचे एसटीकडून सांगण्यात आले आह़े रत्नागिरी आगारातून देखील 4 फेऱया सोडण्यात आल्य़ा प्रवाशाचा देखील उत्तम प्रतिसाद या फेऱयांना लाभत आह़े
जिह्यात आता एकूण 700 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत़ दरम्यान एसटीचे शासनामध्ये विलीनीकरण करावे यासाठी संप सुरू असतानाच जिह्यात सोमवारी 400 हून अधिक फेऱया सुरू करण्यात प्रशासनाला यश आल़े राज्यभर कर्मचारी संपावर ठाम असताना रत्नागिरीत कर्मचारी कामावर हजर राहत आहेत़ असे असले तरी चालक वाहक कामावर हजर रहावेत यासाठी एसटीच्या अधिकाऱयांकडून सर्वतोपरी पर्यंत्न करण्यात येत आहेत़ सोमवारी देखील एसटीच्या कर्मचारी संघटनांशी चर्चा करण्यात आल़ी मात्र कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम असल्याचेच दिसून आल़े
मागील तीन महिन्यापासून चालणाऱया एसटीसंपाचा मोठा फटका रत्नागिरी आगाराला बसला आह़े पूर्ण क्षमतेने रत्नागिरी विभागातील वाहतूक सुरू असताना प्रतिदिन सुमारे 70 लाख रूपये इतके उत्पन्न विभागाला मिळत होत़े आता त्यानुसार मागील दिड महिन्यात मोठा फटका विभागाला बसला आह़े कोटय़ावधींचे उत्पन्न बुडाले आह़े त्यातच कर्मचाऱयांची पगारवाढ देखील करण्याचा निर्णय एसटी मंडळाने घेतला आह़े त्याचाही आर्थिक बोजा एसटी महामंडळावर पडणार आह़े