ऑनलाईन टीम / काबुल :
तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता काबीज केली असून, तेथील परिस्थिती आता नियंत्रणाबाहेर गेली आहे. गोळीबाराच्या घटनांमुळे आणि भीतीपोटी अनेक नागरिक देश सोडत आहेत. रविवारी काबूलहून एअर इंडियाचं एक विमान 129 प्रवाशांना घेऊन दिल्लीला आलं. या विमानातून उतरलेल्या महिला प्रवाशाने अफगाणिस्तानातील धक्कादायक वास्तव सांगितले.
‘तालिबान आम्हाला जिवंत सोडणार नाही. अफगाणिस्तानातील आमचे मित्र-मैत्रिणी तालिबान्यांकडून मारले जातील. स्त्रियांचे कोणतेही हक्क यापुढे आबाधित राहणार नाहीत. जग अफगाणिस्तानला असे वाऱ्यावर सोडेल, हे मनाला पटत नाही, असे सांगताना या महिलेने टाहो फोडला.