प्रतिनिधी/ बेळगाव
पहिल्या टप्प्याची ग्राम पंचायत मतदान झाल्यानंतर दुसऱया टप्प्यातही मोठय़ा चुरशीने मतदान झाले असून या सात तालुक्मयांमध्ये 83.16 टक्के मतदान झाले आहे. सर्वात जास्त निपाणी तालुक्मयात 84.77 टक्के मतदान झाले आह. सर्वात कमी कागवाड तालुक्मयामध्ये 80.94 टक्के मतदान झाले आहे.
पहिल्या टप्प्यापेक्षाही दुसऱया टप्प्यामध्ये काही अंशी मतदान अधिक झाल्याचे दिसून आले आहे. एकूण 11 लाख 59 हजार 65 मतदारांपैकी 9 लाख 63 हजार 846 मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. यामध्ये 5 लाख 498 पुरुष मतदारांनी तर 4 लाख 63 हजार 348 महिला मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. एकूण 218 ग्राम पंचायतांच्या निवडणुकीचे मतदान झाले असून 1693 सदस्यांचे भवितव्य पेटीबंद झाले आहे.
दुसऱया टप्प्यामध्ये सौंदत्ती, रामदुर्ग, चिकोडी, निपाणी, अथणी, कागवाड, रायबाग या तालुक्मयांमध्ये मतदान झाले आहे. दि. 30 रोजी मतमोजणी होणार आहे. प्रत्येक तालुक्यात मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आले आहे. त्या ठिकाणी ही मतमोजणी होणार आहे. आता साऱयांचेच लक्ष मतमोजणीकडे लागले आहे.