ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतातील तीन राज्यात आज (शुक्रवारी ) भूकंपाचे धक्के जाणवले. तिन्हीं राज्यात भूकंपाचे धक्के वेगवेगळ्या वेळी जाणवले. आसाममधील सोनितपूरमध्ये रात्री 2 वाजून 4 मिनिटांनी, मणिपूरमधील चंदेलमध्ये 1 वाजून 6 मिनिटांनी तर मेघालयमधील पश्चिम खासी हिल्समध्ये पहाटे 4 वाजून 20 मिनिटांनी भूकंप झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता अनुक्रमे 4.1 , 3.0 आणि 2.6 रिश्टल स्केल एवढी होती. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे. लोकांना भूकंपाची जाणीव होताच लोक घरातून बाहेर पडले.
यापूर्वी आसामच्या सोनितपूरमध्ये 30 मे रोजी देखील भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यावेळी भूकंपाची तीव्रता 4.1 रिश्टल स्केल इतकी होती.