प्रतिनिधी / बेळगाव
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी दिलेले बलिदान आजच्या पिढीला समजावे यासाठी शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून बलिदान मास आचरणात आणला जातो. फाल्गुन शुक्ल प्रतिपदेपासून फाल्गुन अमावास्येपर्यंत बलिदान मास पाळण्यात येतो. वढू बुद्रुक (सांगली) येथून आणण्यात आलेली धर्मवीर ज्वाला बेळगाव येथील ताशिलदार गल्ली सोमनाथ मंदिर येथून विविध गावोगावी नेण्यात आली.
संभाजी महाराजांनी आपल्या प्राणांची आहुती देत धर्मासाठी बलिदान दिले. हे बलिदान प्रत्येक नागरिकाला समजावे यासाठी बलिदान मासचे आयोजन केले जाते. सोमवारी या बलिदान मासची सांगता होणार आहे. त्यापूर्वी रविवारी प्रत्येक विभागात बेळगाव शहरातून धर्मवीर ज्वाला नेण्यात आली. शिवशंभूचा गजर करत धारकऱयांनी ही ज्योत प्रत्येक विभागापर्यंत नेली.
यडोगा, गोवा, येळ्ळूर, देसूर, हंगरगा, धामणे, सांबरा, मणगुत्ती, हलगा, कडोली, होनगा, मजगाव, अष्टे, शिंदोळी, कर्ले, काकती, वाघवडे, सुळगा, बाळेकुंद्री, खनगाव, मुचंडी, कलखांब, कणबर्गी, मण्णूर, यमनापूर, बेनकनहळ्ळी, पिरनवाडी, चंदगड, हलगा-बस्तवाड, तारिहाळ यासह विविध गावांतील धारकऱयांनी ज्वाला आपापल्या गावी नेऊन तिचे विधिवत पूजन केले.