अज्ञाताने जाणून बुजून जाळल्याचा संशय
वार्ताहर / राजापूर
राजापूर शहरालगतच्या धोपेश्वर खंडेवाडी येथे एक रिक्षा व तीन दुचाकी अशी चार वाहने आगीत जळून खाक झाली आहेत. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली, यामध्ये लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. अज्ञाताने जाणून-बुजून गाड्यांना आग लावल्याचे बोलले जात असून यापकरणी पोलीस स्थानकात तकार दाखल करण्यात आली आहे.
खंडेवाडी येथील रमेश खंडे यांच्या दोन दुचाकी व त्यांचे भाऊ अविनाश खंडे यांची रिक्षा व एक दुचाकी अशी चार वाहने त्यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या रस्त्यालगतच्या शेडमध्ये पार्प करून ठेवलेली असतात. सोमवारी मध्यरात्री खंडे यांच्या घरातील सर्व मंडळी झोपलेली असताना शेडमध्ये लावलेल्या गाड्यांना अचानक आग लागली. रात्री 12.30 च्या दरम्यान या शेडच्या लगत राहणाऱया बांदीवडेकर कुटूंबियांच्या ही घटना निदर्शनास आली. त्यानंतर रूपेश बांदीवडेकर, पसन्न बांदीवडेकर यांच्यासह बांदीवडेकर कुटुंबातील सर्वांनी तात्काळ धाव घेत पाणी मारून आग विझविण्याचा पयत्न केला.
दरम्यान खंडे कुटूंबालाही याबाबत माहीती देण्यात आली. खंडे कुटूंबियांनीही धाव घेत आग विझविण्याचा पयत्न केला. मात्र आग आटोक्यात येईपर्यंत सर्व वाहने जळून खाक झाली होती. या आगीत तीन दुचाकी व रिक्षा अशा चारही गाड्या जळून खाक झाल्याने खंडे यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत खंडे यांनी राजापूर पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली असून गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. दरम्यान अज्ञाताने जाणून-बुजून गाड्या जाळल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनाही तसा संशय असून त्यादृष्टीने पोलीस तपास सुरू आहे.