प्रतिनिधी / नरंदे
हातकणंगले तालुक्यातील नरंदेसह परिसरात जोरदार वारा आणि विजेच्या कडकडासह मुसळधार पाऊस झाला. आज सायंकाळी सहाच्या सुमारास जोरदार वारा असल्याने अनेक घरावरील पत्रे व कौले उडून गेली. घरावरील पत्रे व कौले उडाल्याने अनेक कुंटुबांचे प्रांपचिक साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर विद्युत तारेवर झाडे पडल्याने विद्युत पुवठा खंडीत झाला झाला आहे.
या पावसामुळे कडक उन्हामुळे माळरानावरील करपू लागलेल्या ऊस पिकाला काही प्रमाणात दिलासा मिळाला तर मशागतीसाठी सध्या पावसाची गरज असल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करणेत येत आहे. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात पावसाने दिलासा मिळाला आहे.