बेळगाव : गुड्सशेड रोड येथील निर्मला फौंडेशनतर्फे स्मार्ट सिटीचे कामगार व पोलिसांना अन्न व पाण्याचे वाटप करण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात स्मार्ट सिटीच्या कामगारांकडून शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण तसेच इतर काम सुरू आहे. त्याचसह पोलीस कर्मचारी रात्रंदिवस सेवा बजावत आहेत. या कर्मचाऱयांना पुलाव, शिरा, केळी व पाण्याची बाटली दिली जात आहे.
दररोज 200 हून अधिक गरजूंना ही अन्नाची पाकिटे देण्यात येत आहेत. येत्या काळात छत्री, चादर, टॉवेल, कपडे यांचेही वाटप केले जाणार आहे. यावेळी फौंडेशनचे अध्यक्ष भास्कर पाटील, विनायक चौगुले, रितेश जुवेकर, विनायक सुतार, विशाल सुतार आदी उपस्थित होते.