मुंबई/प्रतिनिधी
माजी केंद्रीय अर्थमंत्री डॉ. पी. चिदंबरम यांनी मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मोदी सरकारच्या अर्थिक धोरणांवर सडकून टीका केली आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून ते पत्रकार परिषदांना सामोरे गेलेले नाहीत. याच मुद्द्यावरून पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी “राष्ट्रीय चलनीकरण धोरण यावर संसदेत कोणतीही चर्चा केली नाही. उलट संसदेचे अधिवेशन संपल्यावर हे धोरण जाहीर केलं. या धोरणाअतंर्गत मोठी पायाभूत सुविधांची कामं पुढील काही वर्षात केली जाणार असल्याचा दावा सरकार करत आहे. मात्र, हे अशक्य आहे”, असं पी. चिदंबरम यांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. यानिमित्ताने या धोरणाबद्दल चिदंबरम यांनी केंद्र सरकरला २० प्रश्न विचारले आहेत. तसेच त्यांनी देशाचे नेतृत्व करत असताना पत्रकार परिषदेला सामोरे न जाणारे नरेंद्र मोदी हे जगातील एकमेव नेते आहेत अशी टीकाही त्यांनी केली आहे.
देशाचे नेतृत्व करत असताना पत्रकार परिषदेला सामोरे न जाणारे नरेंद्र मोदी हे जगातील एकमेव नेते आहेत”, अशी अत्यंत घणाघाती टीका पी. चिदंबरम यांनी केली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करत नाहीत. रोधकांना सामोरं जात नाहीत. “७० वर्षात काहीच झालं नाही असं मोदी सांगत आहेत. याचा अर्थ ते एक प्रकारे मोरारजी देसाई सरकार आणि वाजपेयी सरकार यांच्यावर देखील टीका करत आहेत”, असा मुद्दा उपस्थित करत यावेळी पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.