अनेक ठिकाणी घराचे व दुकानाचे पत्रे उडून मोठ्या प्रमाणात नुकसान
पाटगांव / वार्ताहर
भुदरगड तालुक्यातील पाटगाव परिसरात रविवारी दुपारी चार वाजता वादळी वाऱ्या गारांचा पाऊस पडल्याने अनेकांच्या दुकानाचे व घराचे पत्रे उडून हजारो रूपयांचे नुकसान झाले आहे हा पाऊस शेतीच्या मशागतीसाठी उपयुक्त असला तरी काजू फणस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्याला आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. पाटगाव परिसरात सकाळपासूनच वातावरणात उष्णता जाणवत होती सर्वजण उकाड्याने हैराण झाले असतानाच दुपारनंतर काही काळ ढगाळ वातावरण तयार झाले. वादळी वारे सुटल्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास पावसाने सुरुवात केली. काही ठिकाणी गारपीटही झाली.
पावसामुळे विद्युत खांब कोसळल्याने अनेक भागांत रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडित झाला होता. शिवडाव व तांबाळे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला सुमारे दोन तास गारपीठासह पाऊस झाल्याने तांबाळे येथील संतोष पिळणकर यांच्या शेती केंद्राच्या दुकानावरील पत्रे उडून सुमारे 20 हजाराचे नुकसान झाले पत्रे उडून गेल्याने विक्रीसाठी आणलेले खत आणि बिबियाणे पावसात भिजुन नुकसान झाले आहे तर युवराज मोहिते यांच्या घरावरील पत्रे उडून जाऊन दहा हजाराचे नुकसान झाले आहे.
झालेल्या नुकसानीचा पंचनामा पोलीस पाटील व तलाठी यांच्याकडून करण्यात आला आहे वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडलेली आहेत काही ठिकाणी पावसामुळे विद्युत खांब कोसळल्याने अनेक भागांत रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडित झाला आहे.