– जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा अधिकाऱ्यांना इशारा
प्रतिनिधी/कोल्हापूर
धरणक्षेत्रवगळता कॅचमेंट भागात जास्त पाऊस पडतो. त्याचा फटका सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिह्याला सर्वाधिक बसतो. संभाव्य पूरस्थितीचा फटका बसू नये यासाठी जबाबदार अधिकाऱयांनी धरणातील उपलब्ध पाण्याचे व पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे. तसेच पूरस्थितीत आघाडीवर कार्यरत रहावे असे आवाहन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले. तसेच पूरस्थितीत दक्ष राहून चोवीस तास मोबाईल सुरु ठेवावेत, मेसेजकडे लक्ष द्यावे, कर्तव्यात कसूर केल्यास अधिकाऱयांची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात संभाव्य पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर जिह्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची व्हीसीद्वारे बैठक आयोजित केली होती. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सातारचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलीक, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. कांदबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे उपस्थित होते.
यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार अरुण लाड, प्रकाश आवाडे, चंद्रकांत जाधव यांनी `व्हीसी’द्वारे आपल्या जिह्यात पूरस्थितीमुळे निर्माण होणाऱया स्थितीची माहिती दिली.
यावेळी मंत्री पाटील म्हणाले, शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याचे योग्य नियाजन करुन उर्वरित पाणीसाठा कसा कमी करता येईल, याबाबत जलसंपदा विभागाने नियोजन करावे. त्यामुळे पूरपरिस्थिती उद्भवणार नाही. जिवित आणि वित्त हानी होणार नाही याची दक्षता अधिकाऱयांनी घ्यावी.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, पूरस्थितीत एमएससीबीसह इतर आपत्कालीन यंत्रणांची बरीच धावपळ होते. ती धावपळ होऊ नये यासाठी संबंधित यंत्रणांनी आत्तापासूनच दक्ष रहावे.
सातारचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, कराडच्या पूररेषेसाठी वेगळा निकष नको. कोल्हापूर, सांगलीप्रमाणेच तो पाहिजे. तसेच सातारा जिह्यातील धरणातून किती पाणी सोडण्यात येणार याची कराड शहराला कल्पना द्यावी. त्यामुळे सांगली, कोल्हापूर जिह्यातील लोक सावध राहतील.
पूरबाधित गावाच्या सरपंच, तलाठÎांना नकाशा वाचनाचे प्रशिक्षण द्या : पृथ्वीराज चव्हाण
पूरबाधित गावाचे तलाठी, ग्रामसेवक, सरपंच यांना नकाशा वाचनबाबत प्रशिक्षण द्यावे. तसेच आगामी काही दिवसात पूरस्थितीबाबत कराडला बैठक घ्यावी अशी सूचना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
कोयनेतील पाण्याचे योग्य नियोजन करा : श्रीनिवास पाटील
कोयना धरणातून सोडण्यात येणारे पाणी आणि वीजेचे योग्य नियोजन करावे, असे खासदार श्रीनिवास पाटील यांनी सांगितले.
अनावश्यक पाणी न सोडल्यास पूराचा धोका : जिल्हाधिकारी
जिह्यात धरणात उपलब्ध असलेल्या पाणीसाठÎाचे आवश्यक नियोजन करावे व अनावश्यक पाणी टप्याटप्याने सोडावे. कारण पावसाळी स्थितीत जिह्यातील धरणात 25 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा शिल्लक राहिल्यास कोल्हापूर जिह्याला पूराचा धोका उद्भवू शकतो, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.