कोरोनाच्या प्रतिकारासाठी उद्धव ठाकरे यांची अभिनव संकल्पना
तिसऱ्या संभाव्य लाटेत सर्वसामान्यांच्या पॅमिली डॉक्टर्सवर मोठी जबाबदारी
प्रतिनिधी / मुंबई
कोरोना काळात पॅमिली डॉक्टर्सची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. कोणत्याही लहान मोठÎा आजारात रुग्ण पहिल्यांदा आपल्या जवळच्या, परिवाराच्या डॉक्टरशी संपर्क साधतो. त्यामुळे त्यांची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. सर्वसामान्यांना आपण “माझा डॉक्टर” बनून त्यांना मार्गदर्शन केल्यास रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच तो रोखण्यात मोठी मदत होणार आहे, अशी अभिनव संकल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पॅमिली डॉक्टरांसमोर ठेवली आणि येणार्या तिसर्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले.
कोरोनाला रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी माझे कुटुंब माझी जबाबदारी अशी संकल्पना कुटुंबप्रमुखांसमोर ठेवली होती. त्याचप्रमाणे संभाव्य तिसर्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी त्यांनी पॅमिली डॉक्टरांसमोर संकल्पना ठेवली. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्य टास्क फोर्समधील तज्ञ डॉक्टर्सनी मुंबईतील सुमारे 700 खासगी डॉक्टर्सना कोरोनाबाबतीत वैद्यकीय उपचारांबाबत निश्चित काय पद्धती अवलंबवावी याविषयी एकाचवेळी मार्गदर्शन केले आणि त्यांच्या अनेक शंकांचे निरसन केले. विशेष म्हणजे तीन-चार दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने मुंबईतील सुमारे 300 डॉक्टर्सशी संवाद साधण्यात आला होता. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या दोन्ही सभांमध्ये मिळून मुंबईतील सुमारे एक हजार डॉक्टर्सनी सहभाग घेतला. तंत्रज्ञानाचा सुयोग्य उपयोग करून अगदी थेट तळागाळात काम करणार्या शेवटच्या डॉक्टरशी बोलण्याचा आणि त्यांच्याही सूचना ऐकून घेण्याच्या मुख्यमंर्त्यांच्या उपक्रमाचे वैद्यकीय क्षेत्रात स्वागत होत आहे.
यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित तसेच डॉ. तात्याराव लहाने यांनी कोविड काळातल्या उपचार पद्धतीवर डॉक्टर्सना मार्गदर्शन केले व त्यांच्या शंकांचे निरसन केले. आरटीपीसीआर चाचणीचे महत्व, सीटी स्पॅनची नेमकी किती गरज यावरही या सभेत मार्गदर्शन करण्यात आले.
कोरोनाची लक्षणे फसवी असतात, त्यामुळे येणारा प्रत्येक रुग्ण हा कोरोनाचा तर नसेल ना, हा प्रश्न आपल्या मनात उपस्थित ठेवून त्याची तपासणी डॉक्टर्सनी करणे गरजेचे आहे असेही यावेळी सांगण्यात आले.
”माझा डॉक्टर” बना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना प्रतिबंधात वैद्यकीय क्षेत्र करीत असलेल्या लढाईची प्रशंसा केली तसेच येणार्या तिसर्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, कोरोना काळात पॅमिली डॉक्टर्सची भूमिका अतिशय महत्वाची आहे. कारण कोणत्याही आजारात रुग्ण पहिल्यांदा आपल्या परिवाराच्या डॉक्टरशी संपर्क साधतो. त्यामुळे त्यांची जबाबदारी खूप महत्वाची आहे. सर्वसामान्यांना आपण “माझा डॉक्टर” बनून त्यांना मार्गदर्शन केल्यास रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच तो रोखण्यात मोठी मदत होणार आहे असे ते म्हणाले. पॅमिली डॉक्टर्सनी काळजीपूर्वक तपासणी करताना कोविड लक्षणे ओळखून त्याप्रमाणे तत्काळ उपचार सुरु केल्यास वेळीच रुग्ण बरे होण्यास मदत होईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, घरच्या घरी विलगीकरणातील रुग्णांकडे आपण सर्व डॉक्टर्सनी लक्ष देणे, त्यांची विचारपूस करीत राहणे गरजेचे आहे, त्यामुळे रुग्णाला मानसिक आधारही मिळतो आणि त्याची तब्येत खालावत असेल तर वेळीच त्याला रुग्णालयात दाखल करणे शक्य होते.
कोविड उपचार पेंद्रांमध्येही सेवा द्या
आपल्या परिसरातील कोविड उपचार पेंद्र किंवा जम्बो पेंद्रांना देखील आपल्या सेवेची गरज आहे हे लक्षात ठेवून खासगी डॉक्टर्सनी तिथेही आपली नावे नोंदवावी, असे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात सर्वत्रच उपचार पद्धतीत एकवाक्यता असणे फार महत्वाचे आहे.
लहान मुलांकडे लक्ष ठेवा
तिसर्या लाटेत लहान मुलांना असलेला धोका लक्षात ठेऊन राज्यात बालरोग तज्ञांचा एक टास्क फोर्स निर्माण करण्यात येत आहे याविषयी या सभेत माहिती देण्यात आली. तसेच लहान मुलांच्या वर्तणुकीतील बदल, त्यांना होणारी सर्दी, ताप, डायरिया, दूध व अन्न खाणे कमी करणे किंवा बंद होणे अशा लक्षणांकडे लक्ष देणे गरजेचे आहे असेही सांगण्यात आले.
खासगी डॉक्टर्सकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
संभाव्य तिसर्या लाटेचे नियोजन करताना त्यात खासगी डॉक्टर्सवर विश्वास ठेवून त्यांना मोठÎा प्रमाणावर सहभागी करून घेत असल्याबद्दल अनेक डॉक्टर्सनी समाधान व्यक्त केले
टास्क फोर्सच्या तज्ञ डॉक्टर्सशी बोलण्याची थेट संधी मिळाल्याने अनेक शंकांचे निरसन झाले तसेच उपचार करण्यात अधिक आत्मविश्वास वाढल्याचेही काही डॉक्टर्स म्हणाले. अनेक डॉक्टर्सनी तर कोविड लढाईत काम करण्याची इच्छा असून त्यासाठी विचारणाही केली तर काही डॉक्टर्सनी आयुर्वेद, होमिओपॅथी डॉक्टरांना यात सहभागी करून घ्यावे अशी विनंतीही केली.