गेल्या 40 वर्षांपासून देवराज अर्स मार्गावरील जनता विकासापासून वंचित
प्रतिनिधी /बेळगाव
बसवणकुडची येथील वॉर्ड क्रमांक 48 मधील देवराज अर्स मार्ग येथील रहिवाशांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गटारी, रस्ते, पाणी, डेनेज या समस्यांमुळे येथील जनता अक्षरशः वैतागली आहे. गेल्या 40 वर्षांपासून या समस्यांना जनता तोंड देत आहे. याबाबत अनेकवेळा महापालिकेसह जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. तेव्हा तातडीने आता तरी या समस्या सोडवा, अशा मागणीचे निवेदन या परिसरातील नागरिकांनी दिले आहे.
महापालिकेमध्ये समावेश असलेल्या वॉर्ड क्रमांक 48 मधील या रस्त्याच्या बाजूला गटारी नाहीत. सीडीवर्क झाले नाही. रस्ता योग्यप्रकारे नाही. डेनेजची सोय केली गेली नाही. त्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. येथील समस्या सोडवाव्यात, यासाठी अनेकवेळा निवेदने देण्यात आली. मात्र त्याकडे कानाडोळा केला जात आहे. अक्षरशः आम्ही कंटाळलो आहे. तेव्हा तातडीने या समस्या सोडवाव्यात आणि आम्हाला दिलासा द्यावा, अशी कळकळीची मागणी यावेळी ज्ये÷ांनी केली.
जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री यांच्या नावाने हे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी जी. बी. मठद, व्ही. बी. मडिवाळ, एम. ए. बोरण्णावर, ईश्वर तिगडी, एस. जी. खोडण्णावर, बी. एस. सनपाजी, ए. एस. बागेवाडी यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.