सत्याचे लावण्य पाहून अनेक राजांना ती आपलीच पत्नी व्हावी असे वाटत होते. ती मिळविण्यासाठी त्या सात उन्मत्त बैलांवर विजय मिळविणे अत्यावश्यक होते. तसा प्रयत्न अनेक राजांनी केला होता. त्यापैकी अनेकांना त्या बैलांनी अस्मान दाखवले होते. कित्येकांना घायाळ केले होते. कित्येक त्या बैलांकडून पराभूत होऊन खाली मान घालून परतले होते. तर कित्येक रणभूमी सोडून पळाले होते. त्या सर्वांना आपणाला सोडून कृष्णाला सत्या मिळाली म्हणून वाईट वाटले. ते कृष्णाचा मत्सर करू लागले. त्यांनी द्वारकेच्या वाटेवर कृष्णाला वेढा घालायचे ठरवले.
पूर्वी कृष्ण रुक्मिणी विवाह प्रसंगी जे कृष्णाचे व यादवांचे शत्रू झाले होते ते यांना येऊन मिळाले. त्यांनी सर्वांनी कृष्णाची वाट
अडवली.
घ्या घ्या म्हणोनि यादवभारिं । रिघोनि करिती मारामारी । एक वर्षंती बाणधारिं। एक शस्त्रास्त्रीं भिडताती। भिंडिपाळांचे गुंडेमार। अग्नियंत्रे सुटती क्रूर। बिकट मार्ग रोधूनि शूर। पायभार स्थिरावले। ठायीं ठायीं झाडोझाडी। राहूनि लोटिती प्रचंड धोंडी। घ्या घ्या मारा म्हणती तोंडी । यादवें बापुडी सांपडलीं । आजिचा समय फावला आम्हां। जीत धराया मेघश्यामा। नाग्नजितीचा धरिला प्रेमा। तेणें संग्रामा वरपडला । आतां जाईल कोणीकडे। पडला बलि÷ाचिये दाढे । कोशलपतिही बापुडें। सौहार्दभिडे सांपडलें। नोवरी हिरोनि धरा हरि। नेऊनि मागधाचिये नगरिं । उमचा मागील समरहारी। म्हणोनि शस्त्रास्त्रीं वर्षती। जैसे दरवडेकरी चोर। दुष्ट दुर्मद लहान थोर। वस्त्राहरणासि तत्पर। तेंवि पामर संघटती। यादवांचें सन्नद्ध सैन्य । अग्रभागीं वीर अर्जुन। पार्ष्णिरक्षक तो युयुधान । गान्दिनिनंदन सव्यपार्श्वाr। वामपार्श्वाr उद्धव वीर । मघ्यें कोशल आणि श्रीधर । अष्टौ भागीं यदुकुमार । धीर गंभीर प्रतापी ।
कृष्णाचे सर्व शत्रू त्या कोशल देशात एकत्र आले आणि त्यांनी एकदम यादव सेनेवर हल्ला चढवला. त्यांनी डरकाळी फोडली-बरे झाले! या सत्याच्या प्रेमपाशात अडकून आज हा कृष्ण बरा तावडीत सापडला. त्या नाग्नजितीला ताब्यात घ्या आणि कृष्णावर हल्ला चढवा. त्यांनी बाणांचा व शस्त्रांचा वर्षाव सुरू केला. त्याने यादव सेना सावध झाली व एकवटली. त्या सेनेच्या अग्रस्थानी कृष्णसखा अर्जुन
होता.
सोयरा म्हणिजे सुहृदा बंधु। त्या कृष्णातें करावया मोदु । फाल्गुन करिता जाला युद्ध । तो प्रबंधु अवधारा । मार्ग रोधूनि बळि÷ वैरी । वर्षत असताझं बाणधारिं । अर्जुनें तोषूनि अभ्यंतरिं। गांडीव करी ज्याबद्ध । प्रळयवातें भंगती मेघ । तेंवि पार्थाचे शर अमोघ । शत्रुसैन्या केला भंग। सोडूनि मार्ग ते पळती । आकर्ण गांडिवाकृष्ट बाणीं । रणा आणिल्या वीरश्रेणी । पुढें समरिं न थरे कोण्ही। प्राण घेऊनि पळाले। जेंवि लोटतां मृगनायकें । लपती पळती जंबुकें शशकें । अजसम गजादि स्वापदें मशकें । तेंवि क्षुल्लकें भयभीत ।