अधिकाऱयांचे नियोजन ठरतेय फोल
प्रतिनिधी /बेळगाव
एकेकाळी दहावीच्या निकालात राज्यात पहिल्या दहामध्ये असणाऱया बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ाची घसरण झाली आहे. शिक्षण विभागातील अधिकाऱयांचे नियोजन फोल ठरत असल्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेत घट होत आहे. मागील दहा वर्षांचा विचार करता बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ाची झालेली घसरण चिंताजनक आहे. त्यामुळे यापुढे तरी गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
यावषी दहावीच्या परीक्षेला बसलेले सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा कस लागला नाही. जिल्हावार टक्केवारीही जाहीर करण्यात आली नाही. परंतु मागील दहा वर्षांचा विचार करता बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ाची घसरण झाली आहे.
मागीलवषी सर्वात कमी निकाल
मागील दहा वर्षात सर्वात कमी निकाल 2019-20 या शैक्षणिक वर्षात लागला. त्यावर्षी केवळ 62.88 टक्के इतका नीचांकी निकाल लागला तर 2013-14 मध्ये 89.28 इतका सर्वोच्च निकाल लागला होता. निकालात दरवषी होणारी घसरण ही गुणवत्तेसाठी चिंताजनक ठरत आहे. त्यामुळे वेळीच यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
चिकोडी जिल्हा नेहमीच अव्वल
चिकोडी शैक्षणिक जिल्हा हा नेहमीच बेळगावपेक्षा वरचढ ठरला आहे. एकूण टक्केवारी पाहता या जिल्हय़ाचा पहिल्या दहा ते पंधरा क्रमांकांमध्ये समावेश होतो. चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ाला गुणवत्ता वाढविणे शक्मय आहे. मग बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात का शक्मय नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे शिक्षण विभागातील अधिकाऱयांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे.