जनावरे पकडणे केवळ दिखावा, संख्येत दिवसेंदिवस वाढच
प्रतिनिधी /बेळगाव
शहराबरोबर शहराबाहेरील रस्त्यांवर भटक्मया जनावरांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. भटकी जनावरे पकडण्याची मोहीम केवळ नावापुरतीच शिल्लक राहिल्याने जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे भटक्मया जनावरांनी नागरिक आणि वाहनधारक हैराण झाले आहेत. विशेषतः रात्रीच्या अंधारात अपघात वाढले आहेत. त्यामुळे भटक्मया जनावरांचा बंदोबस्त कधी होणार, असा प्रश्न पडला आहे.
शहरातील धर्मवीर संभाजी चौक, यंदे खूट, युनियन जिमखाना, आंबेडकर रोड, क्लब रोड आदी ठिकाणी त्यांचा वावर वाढला आहे. दिवसभर वाहतुकीला अडथळा ठरत असलेली ही जनावरे रात्रीच्या वेळी अपघातांना निमंत्रण देत आहेत. विशेषतः रस्त्यावरच ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीत अडथळा येत आहे. शिवाय रात्रीच्या वेळी अंधारात दिसत नसल्याने अपघात वाढले आहेत. शिवाय बसथांब्यांवर आसरा घेत असल्याने परिसरात शेण आणि मलमूत्र पडत आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. परिणामी प्रवासी बसस्थानकाबाहेर थांबत आहेत आणि भटकी जनावरे बसथांब्यात थांबत आहेत. हे चित्र सर्वच बसथांब्यांमध्ये दिसत आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्याचा प्रश्नदेखील निर्माण होत आहे. या जनावरांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा, अशी मागणी होत
आहे.
मनपामार्फत जनावरांना पकडण्यासाठी मोहीम राबविण्यात येते. मात्र, या मोहिमेत सातत्य नसल्याने काही दिवसानंतर भटक्मया जनावरांची संख्या वाढत असल्याचेही दिसत आहे. त्यामुळे भटकी जनावरे शहरातील एक समस्या बनली आहे. अस्वच्छता, वाहतुकीला अडथळा, अपघात आणि इतर समस्या या भटक्मया जनावरांमुळे उद्भवत आहेत. त्यामुळे या भटक्मया जनावरांना पकडून त्यांची गोशाळेमध्ये रवानगी करावी, अशी मागणी होत आहे.
भटकी जनावरे पकडण्याची मोहीम केवळ दिखावा
मनपामार्फत शहरातील भटकी जनावरे पकडण्याची मोहीम राबविली जाते. मात्र, प्रत्यक्षात या मोहिमेनंतर शहरातील भटक्मया जनावरांची कायम असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जनावरे पकडण्याची मोहीम केवळ दिखावा आहे. त्यामुळे या मोहिमेत सातत्य ठेवून कायमस्वरुपी बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.