ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 354 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाबधितांची संख्या आता 4421 वर पोहचली असून, आतापर्यंत 114 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे.
देशात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. तसेच विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवण्यात येत आहेत.
महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्याही 868 झाली आहे. यात मुंबई 526, पुणे (शहर व ग्रामीण) 141, सांगली 25, ठाणे परिसर 85, नागपूर 17, अहमदनगर 23, यवतमाळ 04, उस्मानाबाद 03, लातूर 08, औरंगाबाद 10, बुलढाणा 05, सातारा 05, जळगाव 02, कोल्हापूर 02, रत्नागिरी 02, नाशिक 02, सिंधुदुर्ग 01, गोंदिया 01, वाशिम 01, अमरावती 01, हिंगोली 01, तर जालन्यात 01 कोरोना रुग्ण आहे. आतापर्यंत 70 जण या आजारातून बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.