ऑनलाईन टीम / तरुण भारत
भारताची राजधानी दिल्लीमधील वाढते हवा प्रदूषण सध्या चिंतेचा विषय आहे. दिल्लीच्या प्रदूषणाबाबत आता जागतिक आरोग्य संघटनेने एक रिपोर्ट जारी केला आहे. या अहवालानुसार दिल्लीचा समावेश जगातील सर्वाधिक प्रदूषीत शहरांमध्ये करण्यात आला आहे. याच पार्श्वभुमीवर भारतातील 48 टक्के शहरांतील वायू प्रदूषण पातळी WHO ने ठरवलेल्या मानकांपेक्षा 10 पट जास्त असल्याची माहिती नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या नवीन अहवाल “2021 वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट” नुसारसमोर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, 2021 मध्ये, देशातील पीएम 2.5 ची वार्षिक सरासरी पातळी 58.1 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरवर पोहोचली होती. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून नोंदवलेल्या हवेच्या गुणवत्तेतील सुधारणाही संपुष्टात आली आणि पीएम २.५ ची वार्षिक सरासरी पुन्हा २०१९ च्या पातळीवर पोहोचली.
आयक्यू एअर या संस्थेने जारी केलेला हा अहवाल 117 देशांमधील 6,475 शहरांमधील PM2.5 साठी हवेच्या गुणवत्तेच्या डेटावर आधारित आहे. जर पाहिले तर, 2021 मध्ये देशात असे एकही शहर नव्हते, जे WHO च्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता करते. विशेष म्हणजे, वायू प्रदूषणाचा वाढता परिणाम लक्षात घेता, जागतिक आरोग्य संघटनेने सप्टेंबर 2021 मध्ये पीएम 2.5 चे वार्षिक प्रमाण 10 वरून 5 मायक्रोग्रॅम प्रति चौरस मीटरपर्यंत कमी केले , जेणेकरून प्रदूषणाचा वाढता प्रभाव मर्यादित ठेवता येईल.
मध्य आणि दक्षिण आशियातील 15 सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी 11 भारतातील आहेत, त्यापैकी दिल्ली देखील एक आहे. पाहिल्यास, 2021 मध्ये, दिल्लीतील पीएम 2.5 ची पातळी मागील वर्षाच्या तुलनेत 14.6 टक्क्यांनी वाढली आहे. महत्त्वाचे म्हणजे, 2020 दरम्यान, दिल्लीत पीएम 2.5 ची वार्षिक सरासरी पातळी 84 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर नोंदवली गेली, जी 2021 मध्ये वाढून 96.4 मायक्रोग्राम प्रति घनमीटर झाली आहे. त्यामुळे भारताची राजधानी दिल्लीमधील वाढते प्रदुषण हा चींतेचा विषय आहेच. त्याच बरोबर भारतातील 48 टक्के शहरांतील वायू प्रदूषण पातळीने who ची मर्यादा उल्लंघन केल्याचीबाब चींतेत भर टाकणारी आहे.