प्रतिनिधी/ रत्नागिरी
मंगळवारी चाकरमान्यांना घेवून एस.टी महामंडळाच्या तब्बल 56 गाडय़ा जिल्हय़ात दाखल झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक गाडय़ा चिपळूण तालुक्यात दाखल झाल्या असून गेल्या पाच दिवसात 158 बसेस जिल्हय़ात दाखल झाल्याची माहिती रत्नागिरी एस.टी. विभागाने दिली.
पहिल्या दिवशी एकही बस कोकणात दाखल होऊ शकली नव्हती मात्र त्यानंतर दिवसाला 21 ते 56 या संख्येने एकूण 158 बसेस पाच दिवसात जिल्हय़ात दाखल झाल्या आहेत. एसटीने प्रवासी वाहतुकीचा निर्णय ऐनवेळी घेतल्याने बहुतांश चाकरमानी खाजगी वाहनांनीच गावी येत आहेत.