नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
काँग्रेस नेते राहुल गांधी देशातील कोरोना स्थिती , लसीकरण मोहीम यावरून वारंवार केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधत असतात. आज देखील त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचा देशातील लसीकरणाशी संबंध जोडत थेट मोदी सरकारर टीका केली आहे.
राहुला गांधी यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, मंत्र्यांची संख्या वाढली मात्र लसींची संख्या काय वाढलेली नाही, अशा शब्दात त्यांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे.
या ट्वीटसोबतच राहुल गांधी यांनी एका मीडिया रिपोर्टचा दाखला दिला आहे. या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, भारतात प्रतिदिन ८८ लाख लसी दिल्या तर डिसेंबर २०२१ पर्यंत लोकसंख्येच्या ६० टक्के नागरिकांचे लसीकरण होईल. यामुळे येणारीू कोरोनाची तिसरी लाट थांबवण्याचा मदत होईल. तसेच भारतात सध्या प्रतिदिन ३४ लाख लस दिली जात असल्याचे या मीडिया रोपिर्टमध्ये म्हटले आहे.
काही दिवसापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा दिल्लीत विस्तार झाला. राष्ट्रपती भवनात ४३ मंत्र्यांचा शपथविधी झाला. यात महाराष्ट्रातील ४ नेत्यांचा समावेश आहे. नारायण राणे यांना कॅबिनेट तर कपिल पाटील, भारती पवार आणि भागवत कराड यांना राज्यमंत्री पद मिळालं आहे.