ऑनलाईन टीम / भोपाळ :
मध्यप्रदेशातील नरसिंगपूरजवळ एका मालवाहू ट्रकला झालेल्या भीषण अपघात 5 जण जागीच ठार झाले. तर 11 जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नरसिंगपूरमधील पाथा गावाजवळ शनिवारी मध्यरात्री रात्री ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त ट्रक हैदराबादवरून उत्तर प्रदेशातील आग्रा येथे जात होता. आंब्याची वाहतूक करणाऱ्या या ट्रकमधून 18 मजूर प्रवास करत होते. दरम्यान, मध्यरात्री नरसिंगपूरमधील पाथा गावाजवळ असताना ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला. या भीषण अपघात पाच जण जागीच ठार झाले असून, 13 जण गंभीर जखमी झाले आहेत.