प्रतिनिधी / कोल्हापूर
कामाच्या बदल्यात दाम निश्चित नसल्याने मतदान केंद्र निहाय सूचवलेले महाआयुषचे काम करण्यास आशा कर्मचाऱयांनी नकार दिला आहे. या बाबतचे निवेदन पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले आहे.
महाआयुष कामासाठी किती मानधन देणार याबद्दल कोणतीही भूमिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेली नाही. यापूर्वीसुद्धा वेगवेगळय़ा प्रकारची कामे विनामानधन करून घेतली आहेत. तसेच महापूर काळामध्ये सुद्धा आशा व गटप्रवर्तक यांनी चांगले काम करुनही मानधन देण्याची वेळ आली तेव्हा प्रशासनाने हात वर केले आहेत. आता सध्या करत असलेल्या कोविड-19 सर्वे व नियमित कामा चा वर्क लोड आहे. प्रखर उन्हाळा आहे.
मिळणारे मानधनही तुटपुंजे आहे. यामुळे अशांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. घरापासून वाडय़ा-वस्त्या किंवा विखुरलेल्या भागात काम करताना पेट्रोल साठी सुद्धा आमच्या कुटुंबियांचा वेळ आणि पैसा खर्च होत आहे. आम्ही आशा वर्कर्स या मध्यमवर्गीय कुटुंब मधील व गरीब कुटुंबातील आहोत लॉक डाऊनलोड कौटुंबिक अडचणी व समस्यांना देखील आहेत. आमच्यावर हल्ले होत आहेत. आतापर्यंत 26 ठिकाणी प्राणघातक हल्ले झालेले आहेत. सर्वे करत असताना येणाऱया अडचणीमध्ये कोणतीही मदत गाव कमिटीकडून होत नाही या सर्व प्रकरणात अशांना टार्गेट बनवले जात आहे. पर्यायाने कुटुंबाचा समाजाचा रोज पत्करून आम्ही काम करत आहोत. तसेच ग्रामविकास खात्याकडून दिला गेलेला प्रोत्साहन भत्ता हा कोल्हापूर जिह्यातील गट प्रवर्तकांना मिळालेला नाही. महानगरपालिका व नगरपंचायती कार्यक्षेत्रातील आशांना प्रशांत भत्ता मिळालेला नाही. असे असनातान महाआयुषचे काम लादले जात आहे. आम्ही हे काम करणार नाही असे निवेदनात म्हटले आहे.