मुंबई/प्रतिनिधी
माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे. प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नाना पटोले यांनी काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत रॅली काढली. मरिन ड्राइव्ह ते ऑगस्ट क्रांती मैदानपर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीदरम्यान नाना पटोले यांनी ट्रॅक्टर चालवत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. यावेळी माध्यमांशी बोलताना बोलताना नाना पटोले यांनी यापुढे काँग्रेसच महाराष्ट्रात सत्तेत राहणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान नरेंद्र मोदींनी देशाच्या शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. राज्यसभेच्या माध्यमातून आंदोलनावर टीका केली, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं पाप केलं आहे. या माध्यमातून आम्ही देशाच्या अन्नदात्याचा अपमान करेल त्याच्याविरोधात या पद्दतीची व्यवस्था निर्माण केली जाईल असा संदेश देत आहोत, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे