प्रतिनिधी/ सातारा
उन्हाळय़ात मिरची कांढून घेणाऱयांची संख्या मोठी असते. त्याकरता साताऱयातील कच्छी या व्यापाऱयांनी विक्रीसाठी आणलेली मिरची गोदामात ठेवली होती. त्या गोदामाला रविवारी सकाळी साडे दहा ते पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत लाखो रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. मिरचीच्या गोदामाला लागलेल्या आगीमुळे शाहुपूरी परिसरात सगळीकडे ठसकाच लागल्याचे चित्र होते. सातारा पालिकेच्या अग्नीशामक दलाच्या पथकाने आणि खाजगी टँकरने ही आग आटोक्यात आणली.
साताऱयातल्या शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या बाजूलाच प्रसिद्ध व्यापारी कच्छी यांचे मिरचीचे गोदाम आहे. या गोदामाला सकाळी साडे दहा ते पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी धाव घेतली. काहींनी सातारा पालिकेच्या अग्निशामक दलास फोन केला. अग्निशामक दलास माहिती मिळताच पथकाचे अधिकारी सौरभ साळुंखे हे पथकास घटनास्थळी पोहोचले. लक्ष्मी परळकर यांचे दोन खाजगी पाण्याचे टँकर मागवून लगेच पाणी मारण्याचे काम सुरु झाले. आगीत गोदामातील मिरच्या जळाल्याने सगळीकडे मिरच्याचा धुरच निर्माण झाला होता. या धुरामुळे आणि वासामुळे नागरिकांना ठसका लागला होता. काही वेळातच आग अटोक्यात आणण्यात यश आले. परंतु तोपर्यंत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.