प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरानजीकच्या मिरजोळे आदिष्टीनगर, विमानतळाशेजारी साईप्रीती प्रीमियर लीग तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेला सोमवारी 25 एप्रिल रोजी प्रारंभ झाला. या स्पर्धेंचे अंतिम सामने आज बुधवारी 27 एप्रिल रोजी सायंकाळी होणार आहेत.
स्पर्धेच्या उद्घाटनाला मिरजोळे सरपंच गजानन गुरव, उपसरपंच राहुल पवार, तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष वैभव पाटील, माजी सरपंच संदीप नाचणकर, तसेच स्पर्धेचे आयोजक विजय कदम, गुरूदास कदम, अनिकेत भोळे, मयुर कदम, साहिल कदम, ऋतुजा रेवाळे, प्रिती कदम, संजय पंडये, राम नाखरेकर, दत्ताराम किर, नीलकंठ कदम यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.