ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 418 कोटी रुपयांची मदत जमा केली.
भाजप सरकारने मागील तीन वर्षात 1 लाख 325 कोटी रुपयांची मदत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केली आहे, असा दावा योगी आदित्यनाथ यांनी यावेळी केला.
पुढे ते म्हणाले, प्रदेशात आतापर्यंत कोणत्याही सरकारने 5 वर्षात इतकी मदत केली नाही. याच कारणामुळे उत्तर प्रदेश ऊस आणि साखर उत्पादनात देशात पहिल्या स्थानावर आहे.